Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पहलगाम हल्ला अन् पाकिस्तानविषयी PM मोदींनी मन की बातमध्ये काय म्हटले? जाणून घ्या 5 महत्त्वाचे मुद्दे

PM Narendra Modi on pahalgam Attack And Pakistan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमात देशवासियांसोबत संवाद साधला. मन की बात कार्यक्रमाचा हा 121 वा भाग होता. या भागात मोदी यांनी प्रामुख्याने पहलगाम हल्ल्यावर तसेच पाकिस्तानच्या विषयावर महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.

तसेच पीडित कुटुंबांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, 'दहशतवादाविरुद्धच्या आपल्या लढाईत संपूर्ण जग 140 कोटी भारतीयांसोबत उभे आहे. मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की, त्यांना न्याय मिळेल म्हणजे मिळेल.

PM Modi on Pahalgam attack and Pakistan

मन की बात मध्ये बोलताना पीएम मोदींच्या भाषणातील प्रमुख 5 महत्त्वाचे मुद्दे!

  • पहलगाम हल्ल्यामुळे मनाला खूप वेदना झाल्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज जेव्हा मी तुमच्याशी 'मन की बात' बोलत आहे. तेव्हा माझ्या मनात खूप वेदना होत आहेत. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दुःख झाले आहे. प्रत्येक भारतीयाला पीडित कुटुंबांबद्दल सहानुभूती आहे. तो कोणत्याही राज्यातील असो किंवा कोणतीही भाषा बोलतो, या हल्ल्यात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या वेदना जाणवत आहेत. दहशतवादी हल्ल्याचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त उसळत आहे. मी देखील खूप चिंताग्रस्त झालो आहे.

  • काश्मीरची प्रगती शत्रूंच्या डोळ्यात खूपली

'पहलगाममधील हा हल्ला दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांची निराशा दर्शवितो, त्यांचा भ्याडपणा दर्शवितो. ज्या काळात काश्मीरमध्ये शांतता परतत होती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य होते, बांधकाम कामांना अभूतपूर्व गती मिळाली होती, लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत होती, लोकांचे उत्पन्न वाढत होते, तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. आणि हीच गोष्ट देशाच्या शत्रूंना, जम्मू आणि काश्मीरच्या शत्रूंना आवडली नाही, ती शांतता भंग करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. 'दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मालकांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करायचे आहे आणि म्हणूनच त्यांनी एवढा मोठा कट रचला. दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात देशाची एकता, 140 कोटी भारतीयांची एकता ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. ही एकता दहशतवादाविरुद्धच्या आपल्या निर्णायक लढाईचा सर्वात मोठा आधार ठरणार आहे.

  • जगाने भारताला पाठिंबा दिलाय- मोदी

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, भारताबद्दल जे घडले त्याचा राग आपल्यासह संपूर्ण जगाला देखील आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून सतत शोक व्यक्त केला जात आहे. जागतिक नेत्यांनीही मला फोन केले आहेत, पत्रे लिहिली आहेत आणि संदेश पाठवले आहेत. या भयानक दहशतवादी हल्ल्याचा सर्वांनी तीव्र निषेध केला. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल दु:ख व्यक्त केले.

  • दहशतवाद्यांना कठोर शिक्षा अन् पीडितांना न्याय मिळेल

पंतप्रधान म्हणाले की, 'दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण जग 140 कोटी भारतीयांसोबत उभे आहे. मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की त्यांना न्याय मिळेल, न्याय नक्कीच मिळेल. या हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना सर्वात कठोर उत्तर दिले जाईल.

  • माजी इस्रो प्रमुख डॉ. कस्तुरीरंगन यांना श्रद्धांजली

आज भारत वापरत असलेले अनेक उपग्रह डॉ. कस्तुरीरंगन यांच्या देखरेखीखाली प्रक्षेपित करण्यात आले. त्यांचे व्यक्तिमत्व खास होते. तरुण पिढी त्यांच्या कामातून खूप काही शिकू शकते. त्यांनी नेहमीच नावीन्यतेला महत्त्व दिले. शिकण्याचा, एक्सप्लोर करण्याचा आणि काहीतरी नवीन करण्याचा त्यांचा दृष्टिकोन प्रेरणादायी होता, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी डॉ. कस्तुरीरंगन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

  • भारतातील तरुणांनी जगाचा दृष्टिकोन बदलला

भारतातील तरुणांच्या प्रतिभेबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, भारतातील तरुणांनी जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. भारतातील तरुणाई विज्ञान आणि नवोन्मेषाकडे वाटचाल करत आहे. पूर्वी मागासलेपणा आणि इतर कारणांमुळे ओळखल्या जाणाऱ्या भागातही, तरुणांनी अशी उदाहरणे मांडली आहेत जी आपल्याला नवीन आत्मविश्वास देतात.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+