Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Pahalgam Terror attack : पहलगाम हल्ला साधासुधा नाही - हा हिंदूंना धार्मिक लक्ष्य करण्याचा पॅटर्न!

Pahalgam Terror attack : पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी पर्यटकांवर झालेला निर्घुण दहशतवादी हल्ला अत्यंत अमानवी कृत्य आहे. या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये बहुतांश पर्यटकांचा समावेश होता. द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या लष्कर-ए-तैयबाच्या जन्मदात्या संघटनेने लोकांना गोळ्या घालून ठार केले, हा हल्ला केवळ साधासुधा हल्ला नाही, काश्मीर खोऱ्यातील इस्लामी दहशतवादाच्या प्रदीर्घ इतिहासाची पुनरावृत्ती आहे, याची मूळ द्वेषयुक्त विचारसरणीत आहेत, जे हिंदूंविरोधी आहेत.

मुळातः जो हल्ला झाला त्यात हल्लेखोरांना पैसे नको होते. त्यांनी कोणत्या मागण्याही केल्या नाहीत. 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या वेळी खोऱ्यात ज्या घोषणा झाल्या होत्या, तोच नारा देत ते द्वेषभावनेने मारण्यासाठी आले होते.

PahalgamTerror attack

पहलगाममध्ये झालेला हल्ला केवळ लोकांवर केलेला हल्ला नव्हता - हा भारताच्या कल्पनेवरचा हल्ला होता.

इकोज ऑफ 1990: द फॉरगॉटन एक्सोडस

पहलगाम हत्याकांडात तीन दशकांपूर्वी झालेल्या नरसंहार आणि काश्मिरी पंडितांच्या जबरदस्तीने पलायन करण्यास भाग पाडले होते तीच आता पुनरावृत्ती होत आहे. त्यावेळी, मंदिरांची विटंबना केली गेली, घरे जाळली गेली आणि "धर्मांतर करा, पळून जा किंवा मरा." अशा धमक्या ध्वनीक्षेपकाद्वारे देऊन कुटुंबांना हाकलून देण्यात आले होते. काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या अंदाजे 1 लाख 20 हजार ते 1 लाख 40 हजार काश्मिरी पंडितांपैकी 1990 च्या मध्यापर्यंत जवळपास 90 हजार ते 1 लाख पंडितांना पलायन करावे लागले होते. तोपर्यंत, 30 ते 80 च्या दरम्यान अतिरेक्यांनी काहींना आधीच मारले होते.

आज, एकता आणि एकात्मतेच्या भावनेला मूर्त रूप देण्यासाठी पर्यटकांना केवळ भारतीय म्हणून मारले जात असताना, आपण विचारले पाहिजे - खरोखर काही बदलले आहे का? यामध्ये उत्तर स्पष्ट आहे: ते केवळ दहशतवादापुढे नमते नकार देणाऱ्या सरकारच्या अंतर्गत बदलले आहे ते म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कलम 370 रद्द करणे हा फुटीरतावादी शक्तींना ऐतिहासिक धक्का होता,
पाकिस्तान आणि त्याच्या जिहादी कारखान्यांनी पोसलेल्या दहशतवादी संघटनांना शांततापूर्ण, बहुलवादी आणि संयुक्त जम्मू आणि काश्मीरचा विचार सहन ते करू शकत नाही, त्यामुळे ते नागरिकांना लक्ष्य करत आहेत. पहलगाम हे त्यांच्या निराशेचे कृत्य आहे, पुन्हा नंदनवन म्हणून फुलणाऱ्या भूमीवर दहशत निर्माण करण्याचा त्यांचा असा हा शेवटचा प्रयत्न आहे.

ग्लोबल पॅटर्न: बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये हिंदूंचा छळ!

पहलगाममध्ये जे घडले ते केवळ भारतीय भूमीपुरते मर्यादित नाही. या पॅटर्नचे इतर देशांनेही वेदनादायी स्वरुप अनुभवलेले आहे.

काश्मीर खोऱ्यातील, बांगलादेशात किंवा पाकिस्तानमधील हिंदूंनी, विविधता, सहिष्णुता किंवा लोकशाहीला स्थान नसलेल्या कट्टरवादी विचारसरणीचा फटका आजवर सहन केला आहे.

बांगलादेशात, हिंदू लोकसंख्या 1951 मध्ये 22 टक्क्यांवरुन आज 8 टक्क्यांच्या खाली गेली आहे. 2024 मध्ये, हिंदूंना लक्ष्य करणारे एकूण 76 हल्ल्यांची नोंद आहे, - मंदिरांची तोडफोड, घरे जाळणे आणि महिलांवर अत्याचार याचा या हल्ल्यात समावेश आहे.

पाकिस्तानची स्थिती तर आणखी भयावह: ईशनिंदेला कायद्याचे शस्त्र बनवले जाते, मंदिरे उद्ध्वस्त केली जातात आणि अल्पवयीन हिंदू मुलींचे बळजबरीने धर्मांतर केले जाते. 2024 च्या पहिल्या दहा महिन्यांत हिंदूंना लक्ष्य करणाऱ्या 100 हून अधिक घटनांची नोंद तेथे झाली आहे, मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे डोळेझाक केली आहे.

उदारमतवादाचे पुरस्कर्ते जगातील प्रत्येक अल्पसंख्याक गटासाठी आवाज उठवतात पणहिंदू वगळता अशीच परिस्थिती आहे आणि हिंदूंच्या वेदना जागतिक विवेकाला एवढ्या गैरसोयीच्या का आहेत हा मुळ प्रश्न आहे.

भाजप : कट्टरपंथीय दहशतवादाविरुद्ध एकमेव सुरक्षारक्षक

विरोधी पक्ष मतांचे राजकारण करत असताना आणि इस्लामी कट्टरतावादाकडे डोळेझाक करत असताना, भाजप दहशतवादी आणि सामान्य माणूस यांच्यात भिंत बनून उभा राहिला आहे. कणखर राष्ट्रवादी नेतृत्वाशी तडजोड का केली जाऊ शकत नाही, हे पहलगाममध्ये झालेला रक्तपात या गोष्टीचे स्मरण करुन देतो.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+