मुख्यमंत्र्यांना घेऊन जाणाऱ्या विमानाच्या 3 तास हवेतच घिरट्या; हवेतच उड्डाण बदलले, नेमके काय झाले?
भारतातील अनेक विमान कंपन्या त्यांच्या खराब सेवेसाठी कुप्रसिद्ध आहेत. अनेकदा प्रवाशांना या विमानसेवेचा वाईट अनुभव येतो. असाच वाईट अनुभव जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनाही आला. शनिवारी रात्री उशीरा त्यांना दिल्लीला घेऊन जाणारे इंडिगोचे विमान जयपूरला वळविण्यात आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे हे विमान वळविण्यापूर्वी ते सुमारे तीन तास हवेतच घिरट्या घालत राहिले. या सगळ्या प्रकाराबद्दल अब्दुल्ला यांनी आपल्या एक्स प्लॅटफाँर्मवर नाराजी व्यक्त केली. मध्यरात्री उशीरा अब्दुल्लासह इतर प्रवाशांना घेऊन हे विमान जयपूरला गेले.

नेमके काय झाले?
खराब वातावरण आणि खराब परिस्थिती यामुळे जम्मू- काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना दिल्लीला घेऊन जाणारे इंडिगोचे विमान दिल्ली विमानतळावर लॅण्ड होऊ शकले नाही. या विमानाने तीन तास हवेचत घिरट्या घातल्या. त्यानंतरही दिल्ली विमानतळावरची परिस्थिती सुधारली नसल्याने अखेर हे विमान जयपूरला वळविण्यात आले. दिल्ली विमानतळावरील कामकाजाबाबत व तेथील गैरव्यवस्थापनाबाबत सीएम अब्दुल्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पोस्टद्वारे व्यक्त केली नाराजी
त्यानंतर अब्दुल्ला यांचे विमान रात्री एक वाजता जयपूर विमानतळावर पोहोचले तेथे विमानतळावरुन उतरत असताना अब्दुल्ला यांनी पायऱ्यांवरच एक सेल्फी घेत आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामप पोस्टवर तो फोटो अपलोड करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाले अब्दुल्ला?
इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, दिल्ली विमानतळावर खूप घाण होती आणि जम्मूहून उड्डाण केल्यानंतर ३ तासांनी त्याला जयपूरला पाठवण्यात आले. अब्दुल्ला म्हणाले की ते पहाटे १ वाजता विमानाच्या पायऱ्यांवर ताजी हवेचा आनंद घेत होते आणि जयपूरहून ते कधी निघतील हे त्यांना माहित नव्हते.
Delhi airport is a bloody shit show (excuse my French but I’m in no mood to be polite). 3 hours in the air after we left Jammu we get diverted to Jaipur & so here I am at 1 in the morning on the steps of the plane getting some fresh air. I’ve no idea what time we will leave from… pic.twitter.com/RZ9ON2wV8E
— Omar Abdullah (@OmarAbdullah) April 19, 2025
एक्सवरही व्यक्त केली चिंता
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर रात्री उशिरा केलेल्या पोस्टमध्ये, ओमर अब्दुल्ला यांनी दिल्ली विमानतळाला "रक्तरंजित छळाचा कार्यक्रम" म्हटले आणि ते म्हणाले की ते "विनम्र राहण्याच्या मनःस्थितीत नाहीत. दिल्ली विमानतळ हा एक रक्तरंजित शो आहे. जम्मू सोडल्यानंतर ३ तास हवेत राहिल्यानंतर आम्हाला जयपूरला वळवण्यात आले आणि म्हणून मी पहाटे १ वाजता विमानाच्या पायऱ्यांवर ताजी हवा घेत आहे. मला माहित नाही की आपण येथून किती वाजता निघू,"
विमान पहाटे पोहोचले
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळाने देखभालीच्या कामामुळे टर्मिनल 2 (T2) वरील कामकाज अलीकडेच बंद केले आहे, इंडिगो आणि अकासा सारख्या विमान कंपन्यांनी T2 वरून चालणाऱ्या सर्व उड्डाणे टर्मिनल 3 आणि अलीकडेच उघडलेल्या अपग्रेड केलेल्या टर्मिनल 1 वर हलवली आहेत. जयपूरला अडकलेले विमान अखेर पहाटे तीन वाजता दिल्लीला पोहोचले.












Click it and Unblock the Notifications