Nrusinh jayanti 2025 नृसिंहांचा आज अवतार दिन, हिरण्यकश्यपूचा वध कसा झाला? वाचा भक्त प्रल्हादाची कथा
Nrusinh jayanti 2025 : नृसिंह अवतार घेत भगवान विष्णू यांनी हिरण्यकश्यपूचा संहार केला होता. भक्त प्रल्हादासाठी भगवान विष्णू धावून आले आणि त्यांनी आपल्या लहानग्या भक्ताचे संरक्षण केले ही आख्यायिका आहे. भगवान विष्णूने ज्या दिवशी नृसिंह अवतार घेतला आणि खांबातून नृसिंह अवतरले तो आजचाच दिवस, आज या दिवसाला नृसिंह प्रगट दिन म्हणतात.
भगवान विष्णूंचे चौथे अवतार भगवान नृसिंह यांची जयंती वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी, भगवान नरसिंह आपल्या भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी खांब फाडून प्रकट झाले. आज त्यांची जयंती आहे. यानिमित्त आपण नृसिंह अवतार आणि हिरण्यकश्यपूचा वध ही कथा जाणून घेणार आहोत.

भगवान विष्णूंचा कसा होता नृसिंह अवतार?
नृसिंहाचे धड मानवासारखे आणि शरीराचा खालचा भाग सिंहासारखा आहे. तो राक्षस हिरण्यकशिपूचे पोट त्याच्या मांडीवर फाडून मारतो. हिरण्यकशिपू हा दुष्ट हिरण्याक्षाचा मोठा भाऊ होता - जो पूर्वी विष्णूच्या वराह अवताराने मारला होता. आणि परिणामी त्याला विष्णूच्या भक्तांबद्दल तीव्र द्वेष होता.
हिरण्यकश्यपूच्या वधाची कथा काय आहे?
हिरण्यकशिपू हा राक्षस वंशातील राजा होता. ब्रह्मदेवाकडून त्याला वरदान मिळाले होते की त्याला दिवसा किंवा रात्री, घराच्या आत किंवा बाहेर मारता येणार नाही; ना आकाशात ना जमिनीवर, ना स्वर्गात ना नरकात, ना कोणत्याही शस्त्राने, ना हाताने, ना मानवांनी, ना देवांनी, ना राक्षसांनी किंवा प्राण्यांनी त्यांना मारता येणार नाही. या वरदानाने तो अराजकता आणि कहर माजवू लागला. भगवान विष्णूचा जप जो करेल त्याचा तो नाश करत होता. श्रीमन् नारायण नारायण हरी हरी..हा जप त्याच्याच घरात त्याचा पूत्र प्रल्हाद करत असताना पाहून तो क्रोधित होत असे. वारंवार समजावूनही भक्त प्रल्हाद यांनी त्यांचे ऐकले नाही आणि आपल्या प्रभुचे गुणगाण भक्ती जप तो करत राहीला. यामुळे त्याला कड्यावरुन फेकण्यात आले याशिवाय त्याचा मृत्यू व्हावा अशी अनेक कृत्य हिरण्यकश्यपूने केली पण तो आपल्या मुलाला मारु शकला नाही.
शेवटी त्याने आपली बहिण होलिकाची मदत घेतली. होलिकाला अग्नीचे वरदान होते, अग्निमधून जरी ती गेली तरी तिला काहीही होत नव्हते. अशावेळी तिला होळीवर बसवून तिच्या मांडीवर भक्त प्रल्हादाला ठेवण्यात आले पण प्रभुची लिला अशी की, होलिकाचे दहन झाले पण भक्त प्रल्हादाला काहीही झाले नाही. अशावेळी त्याला वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार घेत हिरण्यकश्यरूचा वध केला.
भक्त प्रल्हादाचे संरक्षण, हिरण्यकश्यपूचा वध
हिरण्यकश्यपूला जे वरदान ब्रम्हदेवाकडून लाभले त्यात कोणतीही बाधा न आणता भगवान विष्णूने सर्जनशीलतेने नृसिंह नावाचे मिश्र रूप धारण केले, जे मानव किंवा प्राणी नव्हते, सिंहाच्या रूपात, आणि नरसिंहाने हिरण्यकशिपूची आतडी फाडून संध्याकाळी त्याला मारले. म्हणजेच त्या दिवशी दिवस नव्हता ना रात्र होती ती होती संध्याकाळ. घर अथवा बाहेर मारले नाही पण त्याच्या राजवाड्याच्या उंबरठ्यावर अर्थात दारात मारले. जो आत किंवा बाहेर नव्हता. आकाश किंवा जमीन नाही अशा ठिकाणी म्हणजेच नृसिंहांनी मांडीवर त्याला मारले. यात त्यांनी कोणतेही शस्त्र ना हाताने मारले. नृसिंहांनी त्यांच्या नखांनी पोट फाडले आणि हिरण्यकश्यपूचा वध केला.
नृसिंह करतात भक्ताचे वाईटापासून रक्षण
नरसिंह हे प्रामुख्याने 'महान रक्षक' म्हणून ओळखले जातात जे विशेषतः आपल्या भक्तांचे वाईटापासून रक्षण करतात आणि सर्व वाईट गोष्टींचा नाश करतात. सर्वात लोकप्रिय नरसिंहाची दंतकथा म्हणजे त्याने आपल्या भक्त प्रल्हादाचे रक्षण केल्याची आणि प्रल्हादाचा दुष्ट पिता आणि राक्षस हिरण्यकश्यपूचा वध केल्याची आख्यायिका. आपण आताच वाचली आहे.
नरसिंह हे वैष्णव धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक आहेत आणि त्यांच्या आख्यायिका वैखानस, श्री वैष्णव धर्म, सद्ध वैष्णव धर्म, आणि हिंदू धर्मातील इतर विविध वैष्णव परंपरांमध्ये पूजनीय आहेत. त्यांची परतूर (जि. जालना) येथे पुरातन मंदिर असून याशिवाय अनेक प्रादेशिक हिंदू मंदिरे आहेत, याशिवाय ग्रंथ, कला आणि वसंत ऋतूतील रंगांचा हिंदू सण होळी सारख्या उत्सव साजरा करुन नृसिंहांचे,भक्त प्रल्हादांचे स्मरण केले जाते.












Click it and Unblock the Notifications