Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'गोळ्या झाडल्या तर इकडूनही गोळे टाकले जातील', Operation Sindoor थांबले नाही; भारताचा पाकला इशारा

India Pakistan Ceasefire (Operation Sindoor) : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. आज रविवारी (11 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनएसए, सीडीएस आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत सुमारे दोन तास बैठक घेतली. या बैठकीत पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनावर चर्चा झाली. या बैठकीनंतर, सूत्रांकडून बातम्या आल्या की भारताचे "ऑपरेशन सिंदूर" अजूनही सुरू आहे. जशास तसे उत्तर दिले जातील, असाही निर्धार करण्यात आलेला असून भारताने थेट पाकिस्तानला देखील तसा इशारा दिला आहे.

Narendra Modi Warning to Pakistan

एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, "जर तिकडून अर्थात पाकड्यांकडून गोळी झाडल्या गेल्या तर येथूनही गोळ्या झाडल्या जातील, वेळप्रसंगी गोळे झाडले जातील. त्यांनी आमच्या हवाई तळांवर केलेले हल्ले हे एक महत्त्वाचे वळण होते. भारताने पाकिस्तानला कडक शब्दात स्पष्ट संदेश दिला आहे. यापुढे जर असेच सुरू राहिले तर त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल.

'ऑपरेशन सिंदूर' अजूनही संपलेले नाही

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी बैठकीत सांगितले की, "ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही. जर त्यांनी (पाकिस्तान) गोळ्या झाडल्या तर आम्हीही गोळ्या झाडू, जर त्यांनी हल्ला केला तर आम्हीही हल्ला करू." बैठकीत पंतप्रधान मोदींनी असेही म्हटले की, 'आपण एका नवीन परिस्थितीत आहोत, जगाला ते स्वीकारावे लागेल. पाकिस्तानला ते स्वीकारावे लागेल, ते नेहमीप्रमाणे चालू शकणार नाही.

काश्मीरबाबत कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत असे सांगण्यात आले की 'काश्मीरबाबत आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे, आता फक्त एकच मुद्दा उरला आहे - पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत करणे. याशिवाय दुसरे काहीही नाही. जर ते दहशतवाद्यांना ताब्यात देण्याबद्दल बोलत असतील तर आपण बोलू शकतो. माझा इतर कोणत्याही विषयावर बोलण्याचा हेतू नाही. आम्हाला कोणीही मध्यस्थी करू इच्छित नाही. आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही, अशीही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली.

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांना स्पष्टपणे सांगितले की, जर पाकिस्तानने काही केले तर त्याचे उत्तर आणखी विनाशकारी आणि कठोर असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच रात्री पाकिस्तानने 26 ठिकाणी हल्ला केला आणि भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर हल्ला झाला.

'भारत-पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व परराष्ट्र मंत्र्यांमध्ये संवाद नाही'

भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्र्यांमध्ये कोणताही संवाद झालेला नसल्याचे देखील सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे. ही चर्चा फक्त दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांमध्ये (DGMO) झाली.

बैठकीत असे सांगण्यात आले की, 'जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर (पाकिस्तान) येथील मुख्यालयाचे सर्वात जास्त नुकसान झाले, सर्वात शक्तिशाली शस्त्रे वापरली गेली. जैश-ए-मोहम्मदची निर्मिती आयएसआयने केली होती, हा भारताकडून एक महत्त्वाचा संदेश होता. त्याला उद्धवस्त करण्यात आलेले आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+