Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नरक चतुर्दशीलाच का सुरू होते दिव्यांची रोषणाई? नरकासुराचा वध का अन् कसा झाला? वाचा पौराणिक कथा

Narak chaturdashi 2025 narakasura vadh story : पाच दिवसांच्या दीपोत्सवातील दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी यालाच 'छोटी दिवाळी' किंवा 'काली चौदस' असेही म्हणतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला येणारा हा दिवस दिवाळीच्या आदल्या रात्री साजरा केला जातो.

यंदा हा सण २० ऑक्टोबर, सोमवारी साजरा होत आहे. हा दिवस केवळ नकारात्मकता दूर करण्याचा नसून, याच दिवसापासून घरात दीये लावून दिवाळीच्या मुख्य उत्साहाला सुरुवात होते. या दिवसाला छोटी दिवाळी का म्हणतात, त्यामागे एक रोमांचक पौराणिक कथा आहे, जी भगवान श्रीकृष्णांचा विजय आणि यमराजांच्या पूजेशी जोडलेली आहे.

Narak chaturdashi 2025

नरक चतुर्दशीला 'छोटी दिवाळी' का म्हणतात?

नरक चतुर्दशीला 'छोटी दिवाळी' म्हणण्यामागे प्रमुख कारण म्हणजे, याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी क्रूर राक्षस नरकासुरचा वध करून, १६ हजार स्त्रियांची कैदेतून मुक्तता केली होती. श्रीकृष्णांनी नरकासुराला हरवून संपूर्ण पृथ्वी आणि स्वर्गात शांतता प्रस्थापित केली. हा विजय अत्यंत महत्त्वपूर्ण होता. याच विजयाच्या आनंदात, दिवाळीच्या मुख्य दिवसाच्या आदल्या रात्री दिवे लावून आणि रोषणाई करून उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. त्यामुळे या दिवसाला 'नरक पर विजय' मिळवल्यामुळे 'नरक चतुर्दशी' म्हणतात आणि दिवाळीच्या उत्साहाची सुरुवात म्हणून 'छोटी दिवाळी' असेही म्हटले जाते.

नकारात्मकता दूर करण्याचा दिवस

नरकासुर हा वाईट वृत्तीचा आणि अत्याचारी राजा होता. त्याच्या वधामुळे पृथ्वीवरील 'नरक' (वाईट शक्ती/अधर्म) संपुष्टात आला. म्हणून या दिवशी घरातून सर्व प्रकारचे रोग, नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी दीये लावले जातात.

नरकासुर वधाची कथा

पौराणिक कथेनुसार, नरकासुर नावाचा एक अत्यंत क्रूर राक्षस राजा होता. तो पृथ्वी माता भूदेवी आणि भगवान वराह यांचा पुत्र होता, पण त्याने अधर्माचा मार्ग स्वीकारला. त्याच्या अत्याचाराने देवता आणि पृथ्वीवरील लोक त्रस्त झाले होते. त्याने १६,००० स्त्रियांना कैद केले होते. नरकासुरच्या अत्याचाराला कंटाळून सर्व देवतांनी भगवान श्रीकृष्णांची मदत मागितली.

त्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पत्नी सत्यभामा (जी भूदेवीचा अवतार होती) यांच्यासह गरुडावर स्वार होऊन नरकासुरच्या प्राग्ज्योतिषपूर नावाच्या राज्यावर पोहोचले. भीषण युद्धात, श्रीकृष्णांनी आपल्या सुदर्शन चक्राचा वापर करून नरकासुरचा वध केला. त्यानंतर त्यांनी सर्व १६,००० स्त्रियांची सुटका केली. समाजात त्यांच्या सुरक्षिततेसाठी, त्या सर्व महिलांनी श्रीकृष्णांना विवाहाची विनंती केली, जी त्यांनी मान्य केली.

छोटी दिवाळी आणि यमपूजा

  • छोटी दिवाळी हा दिवस केवळ नरकासुर वधापुरता मर्यादित नाही, तर या दिवशी यमराजांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.
  • यमराजाची पूजा: या दिवशी संध्याकाळी घराच्या बाहेर आणि अंगणात दिवा लावून यमराजांची पूजा करण्याची प्रथा आहे. याला 'यमदीपदान' असेही म्हणतात.नरक चतुर्दशीला यमराजाची पूजा केल्यास अकाली मृत्यूचे भय दूर होते आणि कुटुंबातील सदस्यांना आरोग्य व दीर्घायुष्य लाभते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
  • छोटी दिवाळी हा अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव आहे, जो आपल्याला मुख्य दिवाळीच्या मोठ्या रोषणाईसाठी तयार करतो.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+