Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mallikarjun Kharge : भाषण करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रकृती खालावली, पाहा- VIDEO

Congress President Mallikarjun Kharge : जम्मू-काश्मीरमधील निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कठुआमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करत असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.

Mallikarjun Kharge

जसरोटा येथे जाहीर सभेला संबोधित करत असताना मंचावर त्यांची प्रकृती बिघडली. व्यासपीठावर भाषण करत असताना काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना चक्कर आल्याने ते बेशुद्ध पडू लागले. मात्र, मंचावर उपस्थित असलेले त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि इतर काँग्रेस नेत्यांनी वेळीच त्यांची काळजी घेतली. त्यांना पाणी दिले. यावेळी काही काळ भाषण थांबवण्यात आले. त्यानंतर पुन्हा खरगे उभे राहिले. ते म्हणाले की, मी इतक्या लवकर मरणार नाही. जोपर्यंत मोदी सरकारला हरवणार नाही. तो पर्यंत ही लढाई चालूच राहणार आहे.

मोदींचा पराभव होईपर्यंत जीवंत असेन

भुरळ आल्यानंतर मल्लिकार्जून खरगे काही वेळ व्यासपिठावरच शांत बसले. पाणी पिल्यानंतर काही वेळाने ते पुन्हा बोलण्यासाठी उभे राहिले. ते म्हणाले की, आम्ही राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी लढू. मी 83 वर्षांचा आहे, मी इतक्या लवकर मरणार नाही. पंतप्रधान मोदी सत्तेतून बाहेर असेपर्यंत मी जिवंत असेन. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, या लोकांना (केंद्र सरकार) कधीही निवडणुका घ्यायच्या नाहीत. त्यांना हवे असते तर एक-दोन वर्षात निवडणुका घेता आल्या असत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ते निवडणुकीसाठी सज्ज झाले. पंतप्रधान मोदींनी गेल्या 10 वर्षात भारतातील तरुणांना काहीही दिले नाही.

mallikarjun kharge

खरगे यांचा पीएम मोदींवर हल्लाबोल

भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत खरगे म्हणाले की, पंतप्रधान इथे येऊन तरुणांच्या भविष्यासाठी खोटे अश्रू ढाळत आहेत. सत्य हे आहे की या लोकांनी गेल्या 10 वर्षात संपूर्ण देशातील तरुणांना अंधारात ढकलले आहे. याला खुद्द पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत. भाजपवर निशाणा साधत खगे म्हणाले की, त्यांना कधीही निवडणुका घ्यायच्या नाहीत. त्यांना हवे असते तर ते एक-दोन वर्षांत ते करू शकले असते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यांना निवडणूक नक्कीच हवी होती. त्यांना नायब राज्यपालांच्या माध्यमातून रिमोट-नियंत्रित सरकार चालवायचे होते. पंतप्रधान मोदींनी गेल्या 10 वर्षात भारतातील तरुणांना काहीही दिले नाही. तुम्ही अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू शकता जो 10 वर्षांत तुमची समृद्धी परत आणू शकत नाही? भाजपचा कोणताही नेता तुमच्यासमोर आला तर त्याला विचारा की त्यांनी समृद्धी आणली की नाही.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+