'महाकुंभ नव्हे तो तर मृत्यूकुंभ बनलाय', ममता बॅनर्जींचा घणाघात, UP सरकारची होती नव्हती लाज काढली
Mamata Banerjee on Mahakumbh 2025 : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभाविषयी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार निशाणा साधला. महाकुंभ हा मृत्युकुंभात रुपातंरीत झाला आहे, असा निशाणा त्यांनी साधत युपी सरकारला धारेवर धरले. त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, मी महाकुंभ सारख्या पवित्र सोहळ्याचे व पवित्र माता गंगा यांचा आदर करते. पण तेथील सुविधा व प्रशासनाची हलगर्जीपणा हा लोकांच्या मृत्यूचे कारण बनल असल्याचे त्यांनी सांगितले.
काय म्हणाल्या ममता दीदी, वाचा सविस्तर
महाकुंभासाठी कोणतेही नियोजन केलेले नाही. चेंगराचेंगरीत अनेक लोक मृत्युमुखी पडले, परंतु त्यांच्याबद्दल काहीही माहिती नाही. बरेच लोक सापडले नाहीत, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

श्रीमंत अन् व्हीयापींसाठी खास सुविधा, सर्वसामान्यांचे काय हाल?
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढे बोलताना म्हणाल्या की, महाकुंभात श्रीमंत आणि व्हीआयपींसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे तंबू उपलब्ध आहेत, असे ममता म्हणाल्या. गरिबांसाठी कोणतीही तरतूद नाही. जत्रेत चेंगराचेंगरीची परिस्थिती सामान्य आहे, परंतु त्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेश सरकारने काय नियोजन केले आहे. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ममता यांनी हे विधान केले. यापूर्वी लालू प्रसाद यादव यांनी देखील महाकुंभाविषयी वादग्रस्त विधान केले होते.
ममता बॅनर्जी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा
- विधानसभेत बोलताना त्यांनी महाकुंभाविषयी देखील चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, मी येथे काही व्हिडिओ पाहिले आहेत. ज्यात शुभेंदु अधिकारी म्हणाले की ते हिंदू धर्माबद्दल बोलत होते आणि म्हणूनच त्यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. मी कधीही कोणताही धार्मिक मुद्दा भडकवण्याचा प्रयत्न करत नाही.
- 'भाजप आपले राजकीय हितसंबंध पूर्ण करण्यासाठी धर्माचा वापर करत आहे. जर भाजपने माझे बांगलादेशी कट्टरपंथीयांशी संबंध असल्याचे सिद्ध केले तर मी राजीनामा देखील द्यायला तयार आहे.
- 'भारतात अनेक राज्ये आहेत.' तिथेही डबल इंजिन सरकार आहे. पण पश्चिम बंगालमध्ये आम्ही विरोधकांना बोलण्यासाठी ५०% वेळ दिला आहे. त्यांनी सभागृहाच्या मजल्यावर कागदपत्रे फेकली आहेत. भाजप, काँग्रेस आणि माकप माझ्या विरोधात एकत्र आहेत. त्यांनी मला माझे भाषण देऊ दिले नाही.
- 'भाजप आमदार बंगाल विधानसभेत बोलू देत नाहीत असा खोटा प्रचार करत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य भाजप आमदारांना द्वेष पसरवू आणि लोकांमध्ये फूट पाडू देत नाही.
अमेरिकेतून दंडाने बांधून लोक आणणे हे लज्जास्पद
मी राष्ट्रीय सुरक्षेच्या किंवा परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यांवर बोलत नाही, पण अमेरिकेतून निर्वासित केलेल्या लोकांना साखळदंडांनी बांधून परत आणणे हे लज्जास्पद आहे. अमेरिकेतून निर्वासितांना परत आणण्यासाठी केंद्राने त्यांची वाहतूक विमाने पाठवायला हवी होती, असेही ममता दीदी यांनी विधान केले.












Click it and Unblock the Notifications