'एक रहेंगे तो सेफ रहेंगे' झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदींचा नारा, काँग्रेसने जाती-जातीत फूट पाडली
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेस-जेएमएम युती एकमेकांच्या विरोधात पोटजाती उभे करून ओबीसींमध्ये फूट पाडू इच्छित आहे.'आपण एकजूट राहिलो तर सुरक्षित राहू'. जोपर्यंत ओबीसी, आदिवासी आणि दलितांमध्ये एकजूट होत नाही, तोपर्यंत काँग्रेस केंद्रात सरकार बनवत राहील. "काँग्रेस-झामुमोच्या नापाक कारस्थानांपासून सावध राहा. ते सत्ता खेचण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी हे रविवारी (10 नोव्हेंबर) झारखंडमधील बोकोरो येथे प्रचार सभेत बोलत होते.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसचा SC, ST आणि OBC ऐक्याला स्वातंत्र्यापासून विरोध आहे. जोपर्यंत ऐक्य होत नाही, तोपर्यंत काँग्रेस केंद्रात सरकार बनवत राहिली आणि देशाला लुटत राहिली. छोटानागपूर परिसरात 125 हून अधिक पोटजाती ओबीसी मानल्या जातात. काँग्रेस-झामुमोला पोटजातींना एकमेकांच्या विरोधात उभे करून ओबीसी ऐक्य तोडायचे आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की 'एक रहेंगे तो सेफ रहेंगे'चा नारा मोदी यांनी दिला.
जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या मागणीवर पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांवरही हल्लाबोल केला. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत आणायचे आहे. जेणेकरून आमच्या जवानांना पुन्हा दहशतवादाच्या आगीचा सामना करावा लागेल. मोदींनी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 गाडले. आंबेडकरांचे संविधान तेथे सात दशके लागू नव्हते. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय राज्यघटनेच्या नावाने शपथ घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. हीच आंबेडकरांना खरी श्रद्धांजली असल्याच, मोदी म्हणाले.
झारखंडमध्ये घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारची गरज आहे. राज्यातील सत्ताधारी झामुमोच्या नेतृत्वाखालील युतीवर हल्ला करताना पंतप्रधान म्हणाले, "तुम्ही मूठभर वाळूसाठी तळमळत आहात, ते त्याची तस्करी करत आहेत.जेएमएमच्या नेतृत्वाखालील आघाडीने तयार केलेले भरती माफिया आणि पेपर लीक माफियांना तुरुंगात पाठवले जाईल आणि तरुणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नसल्याचं मोदी यांनी स्पष्ट केलं












Click it and Unblock the Notifications