Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जम्मू-कश्मीरमध्ये तिसऱ्या टप्पासाठी मंगळवारी मतदान; मतदान केंद्र अन् मतदार किती, वाचा सविस्तर

Jammu And Kashmir Assembly Election 2024, Third Phase : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीचा प्रचार रविवारी शांततेत संपला. उद्या 1 आॅक्टोबर रोजी मतदा होणार आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचे मुख्य मुद्दे 'कलम 370' आणि 'राज्याचा दर्जा' हे होते. अंतिम टप्प्यात 40 जागांसाठी 415 उमेदवार रिंगणात आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त पांडुरंग पोले म्हणाले की, 5060 मतदान केंद्रांवर 39 लाखांहून अधिक मतदार मतदान करतील.

राजकीय पक्षांची अनेक आश्वासने

विकास, आरोग्यसेवा, शिक्षण, चांगले रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, परवडणारी वीज आणि नागरी सुविधा हा प्रत्येक राजकीय पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यांचा भाग होता, पण शेवटी लढा 'कलम 370' आणि जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करणाऱ्यांमध्येच होता. विशेष म्हणजे, नॅशनल कॉन्फरन्स (NC) आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) सारख्या प्रादेशिक पक्षांसाठी 'कलम 370' पुनर्स्थापित करणे सर्वात महत्वाचे होते, परंतु राज्याचा दर्जा हे प्रत्येक राजकीय पक्षाने दिलेल्या घोषणापत्रातील वचनांपैकी एक होते.

Jammu And Kashmir Assembly Election 2024

किती उमेदवार रिंगणात?

40 जागांसाठी एकूण 415 उमेदवार रिंगणात आहेत.

  • जम्मूमध्ये 109
  • बारामुल्लामध्ये101
  • कुपवाडात 59
  • बांदीपोरामध्ये 42
  • उधमपूरमध्ये 37
  • कठुआमध्ये 35
  • सांबामध्ये 32

पीएम मोदी, अमित, खर्गे, सचिनसह अनेक नेत्यांच्या सभा

विधानसभा निवडणुकीत NC सोबत पूर्वीची युती असूनही, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात किंवा राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सचिन पायलट आणि प्रियंका गांधी यांच्या प्रमुख नेत्यांच्या भाषणात कलम 370 बद्दल काहीही बोलले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर सर्व वरिष्ठ भाजप नेत्यांनी मतदारांना सांगितले की केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा तात्पुरता आहे आणि जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल केला जाईल.

काँग्रेस, एनसी आणि पीडीपीने मुद्दा उपस्थित केला

निवडणूक प्रचारादरम्यान भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे संसदेत बहुमत असलेले केंद्र सरकारच जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करू शकते. असे असतानाही काँग्रेस, एनसी आणि पीडीपीने हा मुद्दा सोडला नाही. संपूर्ण निवडणूक प्रचारात, NC अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, त्यांचा मुलगा आणि NC उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यासह PDP नेतृत्वाने राज्याच्या दर्जाच्या मुद्द्याचा उल्लेख प्रत्येक भाषणात केला.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+