उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वीच 'इंडिया' आघाडीत फूट?, तेजस्वींच्या 'त्या' विधानाने कलह, नेमकं काय घडल?
INDIA alliance rift : काही दिवसांवर आलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या व २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीमध्ये मतभेदांचे संकेत मिळत आहेत.
नुकतेच राजद नेते तेजस्वी यादव यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २०२९ साठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्याने आघाडीतील इतर प्रमुख नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
तेजस्वी यांनी राहुल गांधींना आपला "मोठा भाऊ" म्हटले आणि त्यांना पंतप्रधानपदी बसवण्यासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, त्यांच्या या विधानामुळे 'आप' आणि 'टीएमसी'सारख्या पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
तर आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना 'आप' ने समर्थन दिले नाही. एकंदरीतच आता इंडिया आघाडीचे भवितव्य धोक्यात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जींची नाराजी
सूत्रांनुसार, आम आदमी पार्टी (आप) चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी तेजस्वी यादव यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तर 'इंडिया' आघाडीच्या नावाखाली कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
त्याचप्रमाणे, तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या प्रमुख ममता बॅनर्जी देखील या विधानावर नाराज असल्याचे म्हटले जाते. पक्षाच्या सूत्रांनुसार, हे विधान "अतिशय घाईघाईने केलेले" असून, सध्या अशा प्रकारची घोषणा करण्याची ही योग्य वेळ नाही, असे त्यांचे मत आहे.
बंगाल राज्यातील राजकारणातील गुंतागुंत
टीएमसीमध्ये नाराजीचे आणखी एक कारण म्हणजे बंगालमधील राजकीय समीकरणे. बंगालमध्ये काँग्रेस ही टीएमसीची थेट राजकीय प्रतिस्पर्धी आहे. ममता बॅनर्जी यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, जर काँग्रेसने बंगालमध्ये डाव्या पक्षांशी युती तोडली, तरच टीएमसी 'इंडिया' आघाडीत सामील होईल.
राहुल गांधींशी चांगले संबंध असूनही, टीएमसीचा असा विश्वास आहे की आता पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवण्याऐवजी बिहारमधील निवडणूक आणि त्यानंतर बंगाल व आसाममधील निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे.
टीएमसीचा असाही विश्वास आहे की, विरोधकांनी मतदार यादीतील पुनरावलोकन आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, २०२९ च्या पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावर नाही.
'इंडिया' आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह
तेजस्वी यादव यांच्या या विधानामुळे केवळ विरोधी पक्षांच्या एकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले नाही, तर आगामी काळात 'इंडिया' आघाडीमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यताही बळावली आहे.
अनेक विरोधी पक्षांना असे वाटते की, निवडणुकीपूर्वीच पंतप्रधानपदाचा चेहरा निश्चित करणे योग्य नाही, कारण त्यामुळे आपापसातील गटबाजी वाढू शकते. सध्या 'आप' आणि 'टीएमसी'सारखे पक्ष स्वतःला 'इंडिया' आघाडीचा अधिकृत भाग मानत नाहीत. त्यामुळे, तेजस्वी यांच्या विधानामुळे आधीच नाजूक असलेल्या या आघाडीच्या एकतेला मोठा धक्का बसला आहे.
-
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम







Click it and Unblock the Notifications