जोरदार पावसाचा कहर, भिंत कोसळून ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (Delhi) शुक्रवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शनिवार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी एक दुर्दैवी दुर्घटना घडली. हरिनगर, जैतपूर परिसरात जोरदार पावसामुळे एका जुन्या घराची भिंत कोसळली, यात सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरुष, दोन महिला आणि दोन लहान मुलींचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटेच्या सुमारास एका जुन्या मंदिराच्या जवळ घडली. त्या ठिकाणी भंगार गोळा करणारे काही कुटुंबे अनेक वर्षांपासून झोपड्यांमध्ये राहत होते. सततच्या पावसामुळे भिंत कमकुवत झाली होती आणि अचानक कोसळली. घटनेवेळी आठ लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण अनेकांची प्रकृती गंभीर असल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हा अपघात कसा घडला?
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटेच्या वेळी मुसळधार पावसामुळे घडली. जुनी आणि कमकुवत झालेली भिंत अचानक कोसळली. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या आठ लोकांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान अनेकांचा मृत्यू झाला.
अतिरिक्त डीसीपी (दक्षिण-पूर्व) ऐश्वर्या शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, "जुन्या मंदिराच्या जवळच्या झोपड्यांमध्ये भंगार गोळा करणारे व्यापारी राहत होते. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली. भविष्यात असा कोणताही अपघात होऊ नये यासाठी आम्ही खबरदारी म्हणून या झोपड्या रिकाम्या केल्या आहेत."
सुरुवातीला या घटनेला 'इमारत कोसळणे' असे म्हटले गेले, पण नंतर तपासणीत हे स्पष्ट झाले की ही एक भिंत कोसळल्याची घटना होती. प्रशासनाने आसपासच्या कमजोर झालेल्या इमारती तात्काळ रिकाम्या केल्या आहेत आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
मुसळधार पावसामुळे दिल्लीची अवस्था बिकट
ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा दिल्लीमध्ये शुक्रवार ८ ऑगस्टच्या रात्रीपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवारी शहरातील अनेक भागांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे, ज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम
पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे, ज्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. पंचकुइया मार्ग, मथुरा रोड, शास्त्री भवन, आरके पुरम, मोती बाग आणि किदवई नगर अशा भागांमध्ये पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे लोकांच्या दैनंदिन कामांवर परिणाम झाला आहे.
प्रशासनाने सखल आणि structurally unsafe भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान खात्यानुसार, पुढील काही तासांतही जोरदार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे सर्वांना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications