दिल्ली विधानसभा अधिवेशनाचा 3रा दिवस; AAP आमदारांना नो एंट्री; आतिशी संतापल्या, काय-काय घडलंय!
Delhi Assembly Session 2025 Third Day : दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आपच्या आमदारांना विधानसभेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. यानंतर, विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्यासह आमदार विधानसभेच्या बाहेर 'जय भीम'चे पोस्टर घेऊन निदर्शने करत आहेत.
आतिशी यांनी सरकारवर साधला निशाणा
अतिशी म्हणाल्या- देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आमदारांना विधानसभेत जाण्यापासून रोखले जात आहे. सभागृहात फक्त एकच आप आमदार अमानतुल्ला खान उपस्थित आहेत. सभागृहाबाहेर आप आमदारांनी घोषणा देत जय भीमचे नारे दिले. त्याचबरोबर हे संविधान संपविण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू असल्याचा आरोपही माजी मुख्यमंत्री तथा आप नेत्या आतिशी यांनी केला.

शीशमहालाची चौकशी होणार- प्रवेश वर्मा
दुसरीकडे दिल्ली सरकारचे मंत्री प्रवेश वर्मा म्हणाले की, शीशमहालची चौकशी केली जाईल. मागील सरकारने पाठपुरावा न केल्यामुळे अनेक प्रकल्पांचा खर्च दुप्पट झाला आहे. आपण सभागृहात २००० कोटी रुपयांच्या मद्य धोरण घोटाळ्यावर चर्चा करू.
येथे, कॅगशी संबंधित काही अहवाल आज विधानसभेत सादर केले जाऊ शकतात. दारू धोरणावरील कॅगच्या अहवालावर तिथे चर्चा होईल. याशिवाय मुख्यमंत्री रेखा गुप्ता विधानसभेच्या उपसभापती पदासाठी मोहन सिंह बिष्ट यांचे नाव प्रस्तावित करतील. बिश्त हे मुस्तफाबादचे भाजप आमदार आहेत.
#WATCH | Delhi: Assembly LoP and AAP leader Atishi says, "Police officers are saying that we (AAP MLAs) are suspended from the assembly, so we will not even be allowed to enter the assembly premises. This is undemocratic and unconstitutional... To date, this has never happened in… pic.twitter.com/FeZ1xpPohT
— ANI (@ANI) February 27, 2025
दारु धोरण्याची चौकशी होणार!
तत्पूर्वी, २५ फेब्रुवारी रोजी, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सभागृहात दारू धोरणावरील कॅग अहवाल सादर केला. अहवालात असे दिसून आले आहे की आपच्या चुकीच्या दारू धोरणामुळे 2002 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यानंतर, सभापती विजेंद्र गुप्ता म्हणाले होते की आम्ही याची चौकशी करण्यासाठी 12-14 सदस्यांची सार्वजनिक लेखा समिती (पीएसी) स्थापन करू. जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
अधिवेशन 3 मार्चपर्यंत वाढवले
यापूर्वी विधानसभेचे अधिवेशन 24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान चालणार होते. त्यानुसार, आज त्याचा शेवटचा दिवस होता. परंतु नंतर अधिवेशन 3 मार्चपर्यंत वाढविण्यात आले. त्याआधी सभागृहात, विरोधी पक्ष 'आप'ने भगतसिंग आणि आंबेडकरांच्या चित्रांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री भवनात गोंधळ घातला. जेव्हा उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना भाषण देत होते, तेव्हा आपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर, विरोधी पक्षनेत्या आतिशीसह 21 आप आमदारांना 3 मार्चपर्यंत निलंबित करण्यात आले.












Click it and Unblock the Notifications