संरक्षणमंत्र्यांची भुज एअरबेसला भेट; राजनाथ सिंह म्हणाले- ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही, हे फक्त ट्रेलर
Rajnath Singh visits Bhuj Airbase Latest News : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी गुजरातमधील भूज एअरबेसला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित सैनिकांशी संवाद साधला. गुरुवारी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर एअरबेसवर भेट दिल्यानंतर आज शुक्रवारी राजनाथ सिंह हे गुजरातमधील एअरबेसमधील कर्मचाऱ्यांच्या भेटीसाठी दाखल झाले.

काय म्हणाले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह?
ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. सध्या हा फक्त ट्रेलर आहे, वेळ आल्यावर आम्ही संपूर्ण चित्र जगाला दाखवून देऊ, असे म्हणत राजनाथ सिंह यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला इशारा दिला आहे. सध्याच्या युद्धबंदीमध्ये आम्ही पाकिस्तानला त्याच्या वर्तनाच्या आधारावर प्रोबेशनवर ठेवलेले आहे. जर त्यांच्या वर्तनात बदल झाला तर कठोर कारवाई केली जाईल. असेही त्यांनी सांगितले.
#WATCH | Gujarat: As Defence Minister Rajnath Singh interacts with them at Bhuj Air Force Station, Indian armed forces jawans raise slogans of 'Bharat Mata ki jai'. pic.twitter.com/Kj0OMYLa4s
— ANI (@ANI) May 16, 2025
ऑपरेशन सिंदूर ही धोक्याची रेड लाईन
राजनाथ सिंह पुढे बोलताना म्हणाले की, तुमच्या शौर्याने दाखवून दिले आहे की हे ते सिंदूर आहे जे शोभेचे नाही तर शौर्याचे प्रतीक आहे. हे ते सिंदूर आहे जे सौंदर्याचे नाही तर दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. हे सिंदूर म्हणजे भारताने दहशतवादाच्या कपाळावर ओढलेली धोक्याची लाल रेषा आहे. या लढाईत सरकार आणि सर्व नागरिक एकत्र आले.
भारतातील प्रत्येक नागरिकाने एका सैनिकाप्रमाणे त्यात भाग घेतला. ज्या कुटुंबांनी तुम्हाला वाढवले आणि कोणत्याही संकोच न करता सेवेत सोपवले त्यांना मी सलाम करतो. सरकार आणि देशातील जनता प्रत्येक परिस्थितीत तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
भारताने पाकिस्तानला प्रोबेशनवर ठेवले
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, आम्ही 'सठे साठ्यम समाचरते' मार्गावरुन जातो आहोत अर्थात जशास तसे. आम्ही शांतीसाठी आमचे हृदय उघडे ठेवले आहे आणि शांतता भंग करणाऱ्यांसाठीही आमचे हात उघडे ठेवले आहेत. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, हा फक्त ट्रेलर आहे, वेळ आल्यावर आम्ही जगाला संपूर्ण फिल्म दाखवू. सध्याच्या युद्धबंदीमध्ये, आम्ही पाकिस्तानला त्याच्या वर्तनाच्या आधारावर प्रोबेशनवर ठेवले आहे. जर त्यांच्या वर्तनात काही अडथळा आला तर कठोर कारवाई केली जाईल.
दहशतवादाविरुद्धची लढाई आता राष्ट्रीय संरक्षणाचा भाग
राजनाथ सिंह म्हणाले की, आता दहशतवादाविरुद्धची लढाई केवळ सुरक्षेचा मुद्दा राहिलेला नाही तर तो राष्ट्रीय संरक्षणाचा एक भाग बनला आहे. आपण ते मुळापासून उखडून टाकू. आता भारत पूर्वीसारखा राहिलेला नाही, एका नवीन भारताचा जन्म झाला आहे. आपण आपल्या प्रिय श्रीरामांच्या मार्गावर चालत आहोत, ज्याप्रमाणे त्यांनी पृथ्वीवरून राक्षसांचा नायनाट करण्याचे व्रत घेतले होते, त्याचप्रमाणे आपण दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याचे व्रत घेत आहोत.












Click it and Unblock the Notifications