Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भाजप नेते मनोज तिवारी यांनी केली मोठी भविष्यवाणी, दिल्ली निवडणुकीत भाजप इतक्या जागा जिंकणार

Manoj Tiwari Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभा निवडणुकीत कोण किती जागा जिंकणार याचे भाकीत केले जात आहेत. भाजप नेते मनोज तिवारी यांनी दिल्ली निवडणुकीत कोणता पक्ष सरकार स्थापन करेल याबद्दल भाकित केले आहे? भाजप-काँग्रेसला किती जागा मिळू शकतात आणि आम आदमी पक्षाचे काय होईल याबद्दल भाकित केलं आहे.

भोजपुरी चित्रपटांचे सुपरस्टार, राजकारणी, संगीत दिग्दर्शक आणि ईशान्य दिल्लीचे भाजप खासदार मनोज तिवारी यांनी वनइंडिया हिंदी कन्सल्टिंग एडिटर मीनाक्षी कांडवाल यांच्याशी केलेल्या विशेष चर्चात दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 बद्दलचे त्यांचे भाकीत शेअर केले आहे.

Manoj Tiwari Delhi Election 2025

8 फेब्रुवारीला दिल्लीत एक नवीन सूर्य उगवेल

या मुलाखतीत भाजप खासदार मनोज तिवारी म्हणाले की, दिल्लीतील जनता ५ फेब्रुवारी रोजी मतदान करेल. 8 फेब्रुवारी हा एक निर्णायक दिवस आहे. त्या दिवशी एक नवीन सूर्य उगवेल. दिल्लीत आम आदमी पक्षाच्या लोकांनी निर्माण केलेला धोकादायक अंधार 8 फेब्रुवारी रोजी संपेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

दिल्लीत दूषित पाणी पिऊन 20 हजार लोकांचा मृत्यू

मनोज तिवारी म्हणाले की, दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणतात. येथे 1993 पासून मुख्यमंत्री निवडून येऊ लागले आहेत, पण सध्याची परिस्थिती अशी आहे की दिल्लीत एका वर्षात 20 हजार अस्वच्छ पाणी पिऊन मृत्युमुखी पडले आहेत. दिल्लीतील अस्वच्छ पाणी हे संथ विषासारखे आहे. म्हणूनच दूषित पाण्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांकडे कोणीही लक्ष देत नाही.

मनोज तिवारी यांच्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ येथे पहा

27 वर्षांपासून भाजपाचे दिल्लीत सरकार का स्थापन झालं नाही?

मनोज तिवारी म्हणाले की, दिल्लीत भाजप 27 वर्षांपासून सत्तेबाहेर आहे, परंतु 2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचे सरकार स्थापन होणार आहे, असे दिसते. कारण पूर्वी दिल्लीतील मतदार म्हणत असत की केंद्रात मोदी आणि दिल्लीत केजरीवाल . यावेळीही दिल्लीचे तेच मतदार म्हणत आहेत की, अब की बार भाजप सरकार.

दिल्लीत भाजपला किती जागा जिंकेल?

मनोज तिवारी म्हणाले की, २०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला 40 ते 50 जागा मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच 45 जागा. त्याच वेळी, काँग्रेसला चार ते पाच जागा मिळू शकतात. आम आदमी पक्ष त्यांच्या कर्माने दिल्लीत अपयशी ठरली आहे.

दिल्ली विधानसभेत एकूण 70 विधानसभेच्या जागा आहेत. सर्व जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. आम आदमी पक्ष गेल्या 10 वर्षांपासून दिल्लीत सरकार स्थापन करत आहे. या निवडणुकीत सर्वांचे लक्ष अरविंद केजरीवाल यांची नवी दिल्लीची जागा, आतिशी मार्लेना यांची कालकाजी, पटपडगंज आणि जंगपुरा या जागांच्या निकालांवर आहे.

फलोदी सट्टा बाजाराचा काय आहे अंदाज

भाजप नेते मनोज तिवारी 2025 च्या दिल्ली निवडणुकीत भाजप सरकार स्थापन करेल असा दावा करत असले तरी, निवडणूक निकालांच्या अचूक भाकितांसाठी प्रसिद्ध असलेले राजस्थानचे फलोदी सट्टा बाजार दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार स्थापनेचे भाकित करत आहे. फलोदी सट्टेबाजी बाजाराचा अंदाज आहे की, आपला 36 ते 38 जागा, भाजपला 31 ते 33 जागा आणि काँग्रेसला एक जागा मिळू शकते. दिल्ली विधानसभा निवडणूकीत सत्तेसाठी बहुमताचा जादुई आकडा 36 जागा आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+