Ashadhai amavasya 2025 today : आज आषाढ अमावस्या? जाणून घ्या वेळ, पूजेची पद्धत आणि या दिवसाचे महत्त्व
Ashadhai amavasya 2025 today : आषाढ महिना म्हटले की, उपवास आणि उत्सवाचा महिना या महिन्यात वटसावित्री पोर्णिमेपासून- गुरुपोर्णिमेपर्यंत बरेच सण आणि व्रत-उत्सव असतात. आज २५ जून २०२५ रोजी आषाढ महिन्यातील अमावस्या आहे. ही मोठ्या अमावस्येमध्ये गणली जाते.
आज आषाढ अमावस्या आणि यानंतर दुसऱ्या दिवशीपासून गुप्त नवरात्र सुरू होते. यावेळी ही अमावस्या आजच म्हणजे बुधवार, २५ जून रोजी आली आहे. आषाढ अमावस्येच्या दिवशी वृद्धी योग आणि नाग करण देखील येत आहेत, जे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, पूजा इत्यादी केल्याने कुंडलीतील सर्व दोष दूर होतात अशी धारणा आणि समज आहेत.

आषाढ अमावस्येच्या दिवशी काय करावे?
- आषाढ अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे.
- जर नदी उपलब्ध नसेल तर गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी इत्यादी पवित्र नद्यांचे पाणी मिसळून स्नान करा.
- त्यानंतर, नित्य पूजा पूर्ण करा. जर तुम्ही पवित्र नद्यांच्या काठावर स्नान करत असाल तर हात भरून सूर्याला जल अर्पण करा.
- पुजाऱ्यामार्फत ज्ञात आणि अज्ञात पूर्वजांसाठी पिंडदान, तर्पण, श्राद्धकर्म इत्यादी करु शकता, यामुळे पितृदोष संपेल.
अमावस्येला नारायण बली करा
नारायण बली हा एक विशेष वैदिक विधी आहे जो पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि अकाली मृत्यु किंवा पितृदोष दूर करण्यासाठी केला जातो. हा विधी प्रामुख्याने अकाली, अपघात, आत्महत्या, खून, बुडणे, आगीने जळणे, वीज पडणे इत्यादींमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी केला जातो.
नारायण बली का केला जातो?
अकाली मृत्युने ग्रस्त असलेल्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी: जेव्हा एखाद्याचा वेळेपूर्वी मृत्यू होतो किंवा तो त्याची शेवटची इच्छा पूर्ण करू शकत नाही. नारायण बली हा त्यांना मोक्ष देण्याचा मार्ग आहे.
पितृदोष दूर करण्यासाठी: जर कुंडलीत पितृदोष असेल, जसे की सातव्या किंवा नवव्या घरात सूर्य-राहुची युती, तर कुटुंबात अडथळे येतात - लग्नात विलंब, संतती न होणे, पैशाचे नुकसान इ. नारायण बली हे दोष शांत करतात.
श्राद्ध किंवा तर्पण नसल्यास: जर मृत व्यक्तीचे श्राद्ध किंवा तर्पण योग्यरित्या केले गेले नाही तर त्याचा आत्मा असंतुष्ट राहतो. हे समाधान नारायण बली देतात.
घरगुती त्रास, वारंवार मृत्यू किंवा आजार झाल्यास: जर घरात कोणी वारंवार मरत असेल, अपघात होत असतील किंवा अज्ञात कारणांमुळे दुःख होत असेल, तर नारायण बली आवश्यक मानले जाते.
-
Eid ul Fitr 2026 : यंदा रमजान ईद कधी? सुट्टीची तारीख कोणती असेल; जाणून घ्या सविस्तर माहिती -
देशात गॅसचा 'एवढा' साठा! बुकिंगमध्ये मोठी वाढ; सरकारने 'हे' घेतले महत्त्वाचे निर्णय, उपाय जाणून घ्या -
Papmochani ekadashi 2026 wishes marathi पापमोचनी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश -
आजचे राशीभविष्य: सोमवार १६ मार्च २०२६, 'या' राशींना होणार प्रचंड धनलाभ; पाहा तुमची रास! -
LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! गॅस सप्लाय बंद होण्याची भीती वाटतेय? घरबसल्या करा e-KYC 'ही' सोपी पद्धत -
Eid ul fitr 2026 wishes marathi hindi: इदनिमित्त खास मराठी-हिंदी 20 शुभेच्छा संदेश वाचा आणि शेअर करा -
आजचे राशिभविष्य 15 मार्च 2026 : 'या' राशींच्या नशिबात राजयोग! कोणाला मिळणार पैसा आणि कोणाला यश? वाचा -
IPL 2026 : मैदानावरचा शेवटचा 'हेलिकॉप्टर शॉट'? आयपीएलनंतर धोनीसह 'हे' 5 दिग्गज घेणार निवृत्ती -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
Rajya Sabha Election 2026 Result : राज्यसभेच्या 37 जागांचा निकाल; पाहा विजेत्यांची यादी -
इराण-इस्त्रायल युद्धावर RSSने मांडली भूमिका; सरकार्यवाह होसबळे यांनी मोदी सरकारचे केले समर्थन! -
Baramati Bypoll 2026 : सुनेत्रा पवार रिंगणात, पण 'बिनविरोध'ची शक्यता धूसर? जाणून घ्या नेमकं समीकरण









Click it and Unblock the Notifications