"संसद तुमच्या इच्छेनुसार चालणार नाही!"; लोकसभेत अमित शहांनी राहुल गांधींना ठणकावले, Video!

Amit Shah Rahul Gandhi clash : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झालेले आहे. आज संसदेचे लोकसभा सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात निवडणूक सुधारणांवरील चर्चेदरम्यान जोरदार शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली.

अमित शाह यांनी राहुल गांधींच्या व्यत्ययावर स्पष्ट आणि आक्रमक प्रत्युत्तर देत, "संसद तुमच्या इच्छेनुसार चालणार नाही," असे ठणकावून सांगितले.

Amit Shah Rahul Gandhi clash

निवडणूक सुधारणांवर चर्चा, गांधींनी आणला व्यत्यय

लोकसभेत गृहमंत्री अमित शाह हे निवडणूक सुधारणा आणि मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याच्या आवश्यकतेवर बोलत होते. मतदार यादीतील त्रुटींवर बोट ठेवणाऱ्या विरोधी पक्षाच्या भूमिकेवर त्यांनी थेट निशाणा साधला.

अमित शाह यांचे थेट प्रत्युत्तर!

"तुम्ही म्हणता मतदार यादी चुकीची आहे. जर तुम्ही ती दुरुस्त केली तर 'एसआयआर' म्हणजे काय? जुनी किंवा नवीन मतदार यादी असो, तुमचा पराभव निश्चित आहे. जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा निवडणूक आयोग महान असतो आणि जेव्हा तुम्ही हरता तेव्हा निवडणूक आयोग भाजपचा असतो." मतदार कार्डच्या सामान्य चुका आणि त्या दुरुस्त करण्याची 'एसआयआर'ची भूमिका स्पष्ट करत असताना, राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला.

राहुल गांधींनी चर्चेचे आव्हान दिले

अमित शाह यांच्या भाषणादरम्यान राहुल गांधींनी उभे राहून व्यत्यय आणला आणि थेट चर्चेचे आव्हान दिले. "तुम्ही हरियाणाबद्दल बोललात. तुम्ही एक उदाहरण दिले. अशी अनेक उदाहरणे आहेत." राहुल गांधींनी अमित शाह यांना इंग्रजीत चर्चेचे आव्हान दिले आणि म्हणाले, "माझ्या पत्रकार परिषदेवर चर्चा करूया, मी तुम्हाला माझ्या पत्रकार परिषदेवर आव्हान देतो."

अमित शाह यांचे आक्रमक उत्तर

राहुल गांधींच्या व्यत्ययानंतर आणि चर्चेच्या आव्हानावर अमित शाह यांनी त्यांना थेट सुनावले. "संसद तुमच्या इच्छेनुसार चालणार नाही. ते (राहुल गांधी) माझ्या भाषणाचा क्रम ठरवू शकत नाहीत." यानंतर राहुल गांधींनी अमित शाह यांच्या उत्तरावर टीका करत, "अमित शाह यांचे उत्तर घाबरलेले आणि बचावात्मक झाले आहे," असे म्हटले.

'मत चोरी' म्हणजे काय? शाहांनी दिले दाखले

राहुल गांधींच्या टीकेनंतरही गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचे भाषण पुढे चालू ठेवले आणि 'मत चोरी' या शब्दाचा खरा अर्थ काय असतो, हे स्पष्ट केले.

ते म्हणाले की, "मी तुम्हाला सांगेन की मत चोरी म्हणजे काय. तुमच्याकडे पात्रता नाही आणि तुम्ही मतदार बनता, अनैतिक मार्गाने निवडणुका जिंकता, तुम्ही जनादेशाचा अवमान करता, ती मत चोरी आहे."

यावेळी त्यांनी काँग्रेस आणि नेहरू कुटुंबावर टीका करताना इतिहासातील दाखले दिले. "नेहरू हे पहिले होते ज्यांनी मत चोरी केली. (काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत) पटेल यांना 28 मते मिळाली, तर नेहरूंना केवळ 2 मते मिळाली."

इंदिरा गांधींचे प्रकरण

"अलाहाबाद उच्च न्यायालयाने असे ठरवले की श्रीमती इंदिरा गांधी निवडणूक निष्पक्षपणे जिंकल्या नव्हत्या. ते झाकण्यासाठी एक कायदा करण्यात आला, ज्यामुळे त्यांना अधिकार मिळाला."

सोनिया गांधींचे नागरिकत्व: "नागरिक होण्यापूर्वी सोनिया (गांधी) मतदार कशा झाल्या, यावरून दिल्ली न्यायालयात वाद पोहोचला आहे."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+