Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कुंभमेळा-2025 : प्रयागराजला विश्वविक्रमी वाहतूक कोंडी; 350 किलोमिटरपर्यंत रांगा

कुंभमेळा आता समाप्तीकडे चालला आहे. जसजसे त्याच्या समाप्तीचे दिवस जवळ येत आहेत, तसतशी लोकांच्या श्रद्धेची लाट वाढत चालली आहे. याच वाढत्या गर्दीमुळे प्रयागराजमध्ये सध्या अभूतपुर्व ट्रॅफिक जामची समस्या निर्माण झाली आहे. प्रयागराजला जाताना मध्य प्रदेशातील जबलपूर ते प्रयागराज या संपूर्ण 350 किमी मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 30 वर लाखो वाहने अडकली आहेत. ती हळूहळू महाकुंभात पोहोचत आहेत. जबलपूरहून प्रयागराजला पोहोचण्यासाठी साधारणतः 5 ते 6 तास लागत असत, पण आता 24 तासांपेक्षा जास्त वेळ लागत आहे. तर रेवा गावाजवळ इतिसाहासातली सर्वात वाईट वाहतूक कोंडी झाली आहे.

Maha Kumbh-2025

जबलपूर ते प्रयागराजला 24 तास

कुंभमेळ्यात आत्तापर्यंत कोट्यवधी भाविकांनी शाहीस्नान केले. मात्र कुंभमेळा संपण्याची तारीख जवळ येऊ लागल्यावर मात्र भाविकांची विक्रमी गर्दी होऊ लागली आहे. राष्ट्रीय महामार्ग-30 वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. रेवा नंतर प्रयागराजला पोहोचण्यासाठी 2 तासांऐवजी 10-12 तास लागत आहेत. हा कदाचित इतिहासातील सर्वात लांब जाम आहे. जबलपूर ते प्रयागराज हे अंतर काहींना 24 तासांपेक्षा जास्त वेळ लागूनही पूर्ण करता आलेले नाही.

सर्वात मोठी वाहतूक कोंडी

राष्ट्रीय महामार्ग 30 वरील महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या गर्दीचा अंदाज यावरून येतो की जबलपूर ते प्रयागराज या मार्गावरील सर्व हॉटेल्स, लग्नाचे लॉन, ढाबे भरलेले आहेत. प्रयागराज महाकुंभाने प्रत्येक बाबतीत विक्रम केला आहे आणि आता वाहतूक कोंडीच्या बाबतीतही विक्रम होत आहे. जबलपूर ते प्रयागराज या 350 किमी मार्गावरील वाहतूक कोंडी ही इतिहासातील सर्वात मोठी कोंडी आहे. राष्ट्रीय महामार्ग 30 वर अशी वाहतूक यापूर्वी कधीही दिसली नव्हती. याचे कारण म्हणजे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक इत्यादी दक्षिणेकडील राज्यांमधून लाखो भाविक जबलपूरच्या या मार्गाने दररोज प्रयागराजला पोहोचत आहेत. यामुळेच प्रयागराजला जाणाऱ्या मार्गांवर तसेच परतीच्या मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी होते. ही परिस्थिती केवळ जबलपूर मार्गावरच नाही तर उत्तर प्रदेशातील प्रयागराजला जोडणाऱ्या प्रत्येक मार्गावर घडत आहे.

जबलपूर टोल नाक्यावर थांबा

महामार्गावरील वाहतूक कोंडीची परिस्थिती हाताळण्यासाठी जबलपूर पोलिस आणि जिल्हा प्रशासनही सक्रिय झाले आहे. रेवामध्ये झालेल्या मोठ्या वाहतूक कोंडीनंतर, जबलपूर पोलिसांनी टोल नाक्यांजवळ लोकांना अडविण्यास सुरुवात केली आहे. जबलपूर महामार्गावरही हजारो वाहनांच्या लांब रांगा दिसत आहेत. रविवारी सकाळपर्यंत कटनीमध्ये ही परिस्थिती होती, परंतु कटनीच्या पलीकडे, सिहोरापर्यंत जाम पसरला. जबलपूरचे जिल्हाधिकारी आणि एसपी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सिहोरा येथे पोहोचले आहेत. प्रयागराजला जाणारी वाहने सिहोरा टोल पोस्टवर थांबवण्यात येत आहेत.

भोपाळहून येणारी वाहनेही अडवली

भोपाळहून येणारे आणि कटनी मार्गे प्रयागराजला जाणारे लोक शाहपुरा-सहजपूर टोल नाक्यावर थांबले आहेत. कुंभमेळ्यामुळे या मार्गावरील सर्व प्रमुख जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रेवामध्ये झालेल्या मोठ्या वाहतूक कोंडीनंतर, रेवा तसेच सतना, मैहर आणि जबलपूर येथील पोलिस महामार्गावर तैनात करण्यात आले आहेत. महामार्गावर आळीपाळीने पोलिस कर्मचारी तैनात केले जात आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी, पोलिस आणि प्रशासन अनेक ठिकाणी अन्न, पाणी आणि इतर गोष्टींची व्यवस्था करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+