पावसाळ्यात प्रतिकार शक्ती वाढवणयासाठी 'या' फळांचे आवर्जून सेवन करा
Health : सहसा पावसाळा हा सर्वांनाच आवडणारा ऋतू आहे. कारण पावसाळा सुरू झाला की निसर्गाचं देखणं रूप पाहायला मिळतं. मात्र त्यासोबतच अनेक आजार देखील घेऊन येतो त्यामुळे पावसाळ्यामध्ये आजार होऊ नयेत म्हणून योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
पावसाळ्यामध्ये आजारांना प्रतिकार करण्यासाठी आणि शरीरातली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी समतोल आहार घेणे आवश्यक आहे. कारण पावसाळ्यात सर्वात जास्त साथीचे रोग, इनफेक्शन, अॅलर्जी होतात.

पावसामुळे वातावरणात निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे जीवजंतू पोसले जातात. शिवाय या काळात तुमची पचनशक्ती मंदावलेली असते. अशा काळात आजारपणे येण्याची जास्त शक्यता असते. पावसाळ्यात आहारात फळांचा समावेश करताना काही गोष्टींची काळजी अवश्य घ्या. या काळात पिकणारी ताजी आणि सीझनल फळं तुमची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नक्कीच फायद्याची ठरू शकतात...
लिची
लिचीमध्ये भरपूर फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या पचनच्या समस्या अथवा अॅसिडिटीचा त्रास कमी होतो. लिचीमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती मजबूत होते. ज्यामुळे सर्दी खोकला अथवा ताप येत नाही. पावसाळ्यात होणाऱ्या त्वचेच्या समस्या दूर ठेवण्यासाठी लिची फायद्याची ठरते.
जांभूळ
उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाच्या सुरुवातीला तुम्हाला जांभळांची फळंही सहज मिळतात. जांभळामध्ये व्हिटॅमिन्स, पोटॅशिअम, फॉलेट, लोह भरपूर असतं. ज्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती मजबूत होते.
डाळींब
डाळिंबामध्ये भरपूर पोषक घटक आणि अँटि ऑक्सिडंट्स असतात. आजारपणातून बाहेर पडण्यासाठी, आजारपण दूर ठेवण्यासाठी, प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात तुम्ही डाळींब नक्कीच खाऊ शकता. शिवाय यातील व्हिटॅमिन बीमुळे शरीरातील लाल रक्त पेशी वाढण्यास आणि रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते.
सफरचंद
सफरचंद हे बारा महिने मिळणारं फळ आहे. आरोग्यासाठी सफरचंद खाणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. कारण सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, बी 1, बी 2, सी तसंच फॉस्फसर, लोह, आयोडिन, कॅल्शिअम अशतं. ज्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते आणि तुमचं आजारपणापासून संरक्षण होतं...
फळं खाणं नेहमीच आरोग्यासाठी हितकारक असतं. मग पावसाळा असो वा कोणताही ऋतू फळं आहारात असायलाच हवी. फक्त पावसाळ्यात फळं खाताना ती ताजी आणि स्वच्छ धुतलेली असतील याची काळजी घ्यायला हवी. कारण फळांवर असलेल्या जीवजंतुंमुळे आजारपण पसरण्याची जास्त शक्यता असते.
ऋतू कोणताही असो प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येकाने त्या- त्या ऋतूमध्ये येणारी फळे तसेच समतोल आहार घेणे गरजेचे असते.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications