"हा तो देश नाही जिथे मी मोठा झालो"; नसीरुद्दीन शाह यांचा सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका
मुंबई: आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह सध्या त्यांच्या एका लेखामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मुंबई विद्यापीठाने एका कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन शेवटच्या क्षणी त्यांना येण्यास मनाई केल्याने शाह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकार, वाढती असहिष्णुता आणि देशातील बदलत्या परिस्थितीवर सडेतोड भाष्य केले आहे.

'जश्न-ए-उर्दू' आणि शेवटच्या क्षणी मिळालेला नकार
नसीरुद्दीन शाह यांना मुंबई विद्यापीठाच्या 'जश्न-ए-उर्दू' कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी ते अतिशय उत्सुक होते. मात्र, कार्यक्रमाच्या अवघ्या एक दिवस आधी कोणतंही ठोस कारण न देता त्यांना "येण्याची गरज नाही" असे कळवण्यात आले. या प्रकाराबद्दल बोलताना शाह म्हणाले, "विद्यापीठाने केवळ मला नाकारले नाही, तर मीच कार्यक्रमाला येण्यास नकार दिला असे सांगून खोटा प्रचार केला, हे अधिक क्लेशदायक आहे."
'विश्वगुरू' संकल्पनेवर प्रहार
सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधताना नसीरुद्दीन शाह यांनी 'विश्वगुरू' या बिरुदावरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणतात, स्वतःला 'विश्वगुरू' म्हणवून घेणाऱ्यांचा मला कधीच हेवा वाटला नाही. गेल्या १० वर्षांतील सरकारच्या कोणत्याही कृतीने मी प्रभावित झालेलो नाही. सत्तेत बसलेल्या लोकांचा अहंकार आणि टीका सहन न करण्याची वृत्ती त्रासदायक आहे.
देशाच्या बदलत्या स्वरूपावर चिंता
शाह यांनी आपल्या लेखात देशातील सद्यस्थितीवर अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी काही प्रमुख मुद्द्यांकडे लक्ष वेधले.
- न्यायव्यवस्थेतील तफावत: विद्यार्थी कार्यकर्त्यांना विनाकारण तुरुंगात डांबणे आणि गंभीर गुन्हेगारांना जामीन मिळणे.
- इतिहासाशी छेडछाड: शालेय पाठ्यपुस्तकांमधून सोयीनुसार बदललेला इतिहास.
- द्वेषाचे राजकारण: अल्पसंख्याकांना लक्ष्य करणारी भाषणे आणि गोरक्षणाच्या नावाखाली होणारी हिंसा.
"हा तो देश नाही जिथे मी लहानाचा मोठा झालो आणि ज्याच्यावर प्रेम करायला मी शिकलो. आज मतभेद व्यक्त करणे म्हणजे देशद्रोह मानला जात आहे," अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली.
जॉर्ज ऑरवेलच्या '१९८४'चा संदर्भ
लेखकाने जॉर्ज ऑरवेल यांच्या प्रसिद्ध कादंबरीचा संदर्भ देत सध्याच्या परिस्थितीची तुलना 'थॉट पोलीस' (विचारांवर पाळत ठेवणारी यंत्रणा) शी केली आहे. "जेव्हा महान नेत्याची प्रशंसा न करणे हा गुन्हा मानला जातो, तेव्हा लोकशाही धोक्यात येते. जो द्वेष पूर्वी काही मिनिटांपुरता मर्यादित होता, तो आता २४ तास पसरवला जात आहे," असेही त्यांनी नमूद केले.
-
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता! -
साताऱ्यात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, पण खुर्ची धोक्यात? जिल्हा परिषद अध्यक्षांचे प्रमाणपत्रच 'बोगस'? -
लिव्ह-इन, लॅविश लाईफ आणि ३५० कोटींची माया; 'मेजर इक्बाल' अर्जुनचा पडद्यामागचा शाही थाट -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications