LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग
LPG cylinder booking rule : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक स्तरावर ऊर्जा क्षेत्रात निर्माण झालेला तणाव याचा परिणाम आता थेट भारतीय स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत निर्माण झालेली अनिश्चितता आणि अफवांमुळे होणारी साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नव्या नियमानुसार, आता शहरी आणि ग्रामीण भागासाठी सिलिंडर बुकिंगची कालमर्यादा वेगळी निश्चित करण्यात आली आहे.

काय आहे नवीन नियम? (LPG Booking Interval)
केंद्र सरकारने सिलिंडर बुकिंगमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचे मुख्य दोन भाग करण्यात आले आहेत:
१. ग्रामीण भाग: ग्रामीण भागातील ग्राहकांना आता एका सिलिंडरनंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी ४५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
२. शहरी भाग: शहरी भागातील ग्राहकांसाठी ही कालमर्यादा २५ दिवस इतकी निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी देशभरात हा कालावधी २१ दिवसांचा होता, जो अलीकडेच २५ दिवसांपर्यंत वाढवण्यात आला होता. मात्र, आता ग्रामीण भागासाठी हा कालावधी थेट दुप्पट (४५ दिवस) करण्यात आला आहे.
निर्णयामागचे मुख्य कारण: अफवा आणि साठेबाजी
गेल्या काही दिवसांपासून गॅस टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. यामुळे घाबरलेल्या ग्राहकांनी (Panic Buying) गरजेपेक्षा आधीच बुकिंग सुरू केले होते. जे ग्राहक साधारणपणे ५५ दिवसांनी सिलिंडर बुक करत होते, त्यांनी अवघ्या १५ दिवसांतच दुसरे बुकिंग करण्यास सुरुवात केली. या अचानक वाढलेल्या मागणीमुळे यंत्रणेवर ताण निर्माण झाला आणि काळाबाजार होण्याची शक्यता वाढली. हा 'आर्टिफिशियल' ताण कमी करण्यासाठी सरकारने बुकिंगमधील अंतर वाढवले आहे.
संसदेत हरदीप सिंह पुरी यांचे स्पष्टीकरण
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत या विषयावर सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, "देशात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. केवळ ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी आणि पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी हे प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत." तसेच, गेल्या पाच दिवसांत एलपीजी उत्पादनात २८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांचा सवाल आणि सरकारचे उत्तर
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एलपीजी तुटवड्यावरून सरकारला घेरले. गॅसअभावी रेस्टॉरंट्स बंद पडत असून लहान व्यापाऱ्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना पुरी यांनी सांगितले की, ३३ कोटी भारतीय कुटुंबांच्या स्वयंपाकघरात गॅसची कमतरता भासू नये ही सरकारची प्राथमिकता आहे. भारताची कच्च्या तेलाची पुरवठा स्थिती सुरक्षित असून आपण अनेक देशांकडून तेल खरेदी करत आहोत, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही.
ग्राहकांसाठी महत्त्वाच्या गोष्टी
- साठेबाजी टाळा: गरजेपेक्षा जास्त सिलिंडर साठवून ठेवू नका.
- नव्या नियमांचे पालन: जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल, तर तुमच्या दोन बुकिंगमध्ये ४५ दिवसांचे अंतर असणे अनिवार्य आहे.
- पुरवठा सुरळीत: सरकारने उत्पादनात वाढ केल्यामुळे येत्या काही दिवसांत परिस्थिती अधिक सामान्य होईल












Click it and Unblock the Notifications