Year Ender 2024: हे वर्ष टीम इंडियासाठी खासं राहिलं, रोहित बिग्रेडने वर्ल्ड कपचा दुष्काळ संपवला
Year Ender 2024, India Cricket Team: भारतीय क्रिकेट संघासाठी 2024 हे वर्ष अत्यंत अविस्मरणीय वर्ष ठरले. या वर्षी भारतीय क्रिकेट संघाने T-20 विश्वचषक जिंकून क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. भारतीय संघाने टी-२० क्रिकेटमध्येही आपला दबदबा कायम ठेवला. सन 2024 मध्ये भारतीय संघाने एकूण 26 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 22 सामने जिंकले आणि फक्त 2 सामने गमावले आहेत.
भारताने T-20 विश्वचषक जिंकला
भारतीय क्रिकेट संघाने T-20 विश्वचषक जिंकून क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. विशेष म्हणजे या वर्षी भारतीय संघाने एकही टी-20 मालिका गमावली नाही. T20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाची कामगिरी सर्वात खास राहिली आहे. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून संघाने विजेतेपद पटकावले. हा विश्वचषक विजय भारतीय क्रिकेट इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय ठरला. कारण टीम इंडियाने एकही सामना न गमावता विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे.

भारतीय क्रिकेट संघाची 2024 मध्ये दमदार कामगिरी
2024 मध्ये भारतीय संघाच्या दमदार कामगिरीचे कारण युवा खेळाडू होते. युवा खेळाडूंनी आपली टॅलेंट सिद्ध करून अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. 2024 हे वर्ष भारतीय क्रिकेटला नवीन उंचीवर घेऊन गेले. टीम इंडियाने हे सिद्ध केले की भारत T20 क्रिकेटमधील सर्वात मजबूत संघांपैकी एक आहे.
वर्षाच्या सुरुवातीला मालिका 3-0 ने जिंकली
भारतीय संघाने 2024 च्या सुरुवातीला अफगाणिस्तानविरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती. भारतीय संघासाठी ही मालिका खूपच रोमांचक होती. भारतीय संघ सर्व सामने जिंकण्यात यशस्वी ठरला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये शेवटच्या चेंडूवर निकाल लागला, जे अतिशय रोमांचक होता. अंतिम सामन्यात सामना बरोबरीत संपला, त्यानंतर दोन सुपर ओव्हर्स खेळल्या गेल्या आणि शेवटी भारतीय संघाने सुपर ओव्हर जिंकून मालिका 3-0 ने जिंकली.
झिम्बाब्वेविरुद्ध शानदार विजय मिळवला
T20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर भारतीय युवा संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला. जिथे पाच सामन्यांची T20 मालिका खेळली गेली. या मालिकेत शुभमन गिलने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. या मालिकेत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. भारतीय संघाने ही मालिका 4-1 ने जिंकली. या मालिकेत अभिषेक शर्माची चमकदार कामगिरी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. त्याने उत्कृष्ट शतकही झळकावले. 2024 साली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची टी-20 मालिका खेळली होती. चार सामन्यांच्या या मालिकेत भारताने 3-1 अशी मालिका खिशात घातली.
भारताने टी-20 विश्वचषक जिंकला
2024 च्या या वर्षात T20 विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. टीम इंडियाने पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड सारख्या बलाढय़ संघांचा पराभव केला. अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेने दडपण वाढवले तेव्हा भारतीय संघासाठी ते कठीण आव्हान बनले होते, पण सूर्यकुमार यादवने लाँग ऑफवर घेतलेला उत्कृष्ट झेल हे भारताच्या विजयाचे सर्वात मोठे कारण ठरले. या झेलने भारतीय संघाला दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.












Click it and Unblock the Notifications