'हे स्वप्नापेक्षा कमी नाही', कर्णधार झाल्यानंतर सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया
Suryakumar Yadav : टी-20 विश्वचषक 2024 मधील विजयानंतर रोहित शर्माच्या जागी सूर्यकुमार यादवची भारताचा नवा टी-20 कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 27 जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेत तो संघाचे नेतृत्व करेल. कर्णधारपदासाठी हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमारची निवड करण्याचा बीसीसीआयचा निर्णय अनेकांना चकित करणारा होता.

ही मालिका 27 जुलैला पल्लेकेलेमध्ये सुरू होईल आणि 30 जुलैला संपेल. विशेष म्हणजे हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमारला प्राधान्य देण्यात आले होते, हार्दिक पांड्याला उपकर्णधारही बनवण्यात आले नव्हते. ही नेतृत्वाची भूमिका सूर्यकुमारसाठी अजिबात नवीन नाही.
यापूर्वी त्याने नोव्हेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताचे नेतृत्व केले होते, ज्यामध्ये त्यांनी 4-1 ने मालिका जिंकली होती. त्याने डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली होती.
कर्णधार बनल्यानंतर सूर्यकुमारने इंस्टाग्राम पोस्टद्वारे कृतज्ञता व्यक्त केली. त्याने लिहिले, "सर्वांचे प्रेम, समर्थन आणि शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद. गेले काही आठवडे स्वप्नापेक्षा कमी नव्हते आणि मी खरोखर आभारी आहे." या नवीन भूमिकेमुळे महत्त्वाची जबाबदारी, उत्साह आणि जोशपूर्ण आहे.
BCCI ने श्रीलंका मालिकेसाठी भारताच्या T20 संघाची घोषणा केली असून या दौऱ्यातील T20 आणि ODI या दोन्ही मालिकेसाठी सूर्यकुमार यादवला कर्णधार आणि शुभमन गिल उपकर्णधारपदी नियुक्त केले आहे. या संघात यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग आणि रियान पराग या खेळाडूंचा समावेश आहे.
गौतम गंभीरचा प्रशिक्षक म्हणून हा पहिलाच दौरा असेल. त्याने रोहित शर्मा आणि कोहलीला एकदिवसीय मालिकेत खेळण्याची विनंती केली आणि दोन्ही खेळाडूंनी होकार दिला. रोहित शर्मा वनडे मालिकेत टीम इंडियाचे कर्णधार असेल.












Click it and Unblock the Notifications