IND vs ENG: शुभमन गिलने एका वाक्यात ब्रिटिश पत्रकाराला शांत केलं; नेमकं काय घडलं?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका आजपासून सुरू होत आहे. यंदाची मालिका विशेष आहे, कारण टीम इंडियामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारखे दिग्गज खेळाडू अनुपस्थित आहेत. या पार्श्वभूमीवर संघाचे नेतृत्व आता तरुण आणि उत्साही शुभमन गिलकडे देण्यात आले आहे, जो वयाच्या केवळ 25 व्या वर्षी भारताचा 37 वा कसोटी कर्णधार बनला आहे.

पहिल्या कसोटीपूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शुभमन गिलने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी नव्या संघाबाबत, रणनीतीबाबत आणि गिलच्या नेतृत्वशैलीबाबत अनेक प्रश्न विचारले. त्यातच एका ब्रिटिश पत्रकाराने विचारलं की, गिलच्या नेतृत्वाखाली भारत कोणत्या दृष्टिकोनातून कसोटी क्रिकेट खेळणार आहे?
गिलने या प्रश्नाला फारच नेटका, पण प्रभावी असा उत्तर दिलं. "हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला वाट पहावी लागेल."
त्याच्या या थेट आणि आत्मविश्वासपूर्ण उत्तरामुळे पत्रकाराच्या पुढच्या प्रश्नांना जणू अडथळा आला. सध्या इंग्लंडमध्ये 'बॅजबॉल' ही संकल्पना गाजत आहे.
बेन स्टोक्स आणि ब्रेंडन मॅक्युलम यांच्या आक्रमक शैलीच्या क्रिकेटमुळे इंग्लिश संघाला नवी ओळख मिळाली आहे. त्यामुळे भारतीय संघ देखील 'असेच काहीतरी' खेळेल का, असा सूर पत्रकारांच्या प्रश्नामध्ये होता. पण गिलच्या एका वाक्याने चर्चेला पूर्णविराम दिला.
💬 💬 It's the biggest honour a player can get.
— BCCI (@BCCI) June 19, 2025
Shubman Gill shares his thoughts on becoming #TeamIndia's Test captain.#ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/m4FQClnwbP
गिलसमोर आहे एक मोठं आव्हान
विराट कोहली, रोहित शर्मा, आर. अश्विन यांसारख्या अनुभवी खेळाडूंशिवाय भारतीय संघ सध्या एका संक्रमण कालखंडातून जात आहे. अशावेळी गिलकडे संपूर्ण नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याला केवळ आपला खेळच नव्हे, तर संघाचाही मार्गदर्शक व्हावं लागणार आहे. अशा परिस्थितीत गिलसारख्या तरुण खेळाडूकडून भारतीय संघ काय धोरण अवलंबतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही कसोटी मालिका 4 ऑगस्ट 2025 रोजी संपणार आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये आधीच दाखल झाला असून, त्यांनी सराव सत्रांनाही सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हर्षित राणाचा ऐनवेळी संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड:
कर्णधार: शुभमन गिल
उपकर्णधार आणि यष्टिरक्षक: ऋषभ पंत
यशस्वी जयस्वाल
के. एल. राहुल
साई सुदर्शन
नितीश कुमार रेड्डी
रवींद्र जडेजा
ध्रुव जुरेल (विकेटकीपर)
अभिमन्यू ईश्वरन
शार्दुल ठाकुर
जसप्रीत बुमराह
मोहम्मद सिराज
प्रसिद्ध कृष्णा
करुण नायर
वॉशिंगटन सुंदर
आकाश दीप
अर्शदीप सिंह
कुलदीप यादव
हर्षित राणा
शुभमन गिलसाठी ही मालिका केवळ एक कर्णधार म्हणून नव्हे, तर भारतीय क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात करणारा क्षण आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये कोणती नवी दिशा पकडतो, हे पाहणं खरोखरच रंजक ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications