Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शाब्बास मुलींनो! चीनी तैपईला हरवून भारतीय संघाने जिंकला कबड्डीचा वर्ल्डकप, PM मोदी काय म्हणाले? वाचा

Kabaddi world cup 2025 indian women team wins final : भारतीय महिला कबड्डी संघाने ढाका येथे झालेल्या कबड्डी विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करत विजयाची नोंद केली आहे. भारतीय महिला खेळाडूंनी सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून देशाचा मान वाढवला आहे.

अंतिम सामन्यात 'वुमन इन ब्लू'ने अत्यंत रोमांचक लढतीत चीनी तायपेई संघाचा ३५-२८ अशा गुणांच्या फरकाने पराभव करून विश्वविजेतेपदाचा मुकुट आपल्या डोक्यावर चढवला.

kabaddi world cup 2025 indian women team wins final

संपूर्ण स्पर्धेत अपराजित (Kabaddi World Cup 2025)

या संपूर्ण स्पर्धेदरम्यान भारतीय संघ अजिंक्य राहिला. त्यांनी या खेळात किती ताकद आहे हे दाखवून दिले. या विश्वचषकात एकूण ११ देशांनी सहभाग घेतला होता. भारतीय संघाने लीग स्टेजमध्येच आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यांनी थायलंड (६५-२०), यजमान बांगलादेश (४३-१८), जर्मनी (६३-२२), आणि युगांडा (५१-१६) यांसारख्या बलाढ्य संघांना मोठ्या फरकाने पराभूत केले. उपांत्य फेरीतही भारताने इराणला ३३-२१ ने नमवून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते.

चीनी तायपेईचीही दमदार खेळी

अंतिम सामन्यातील भारताचा प्रतिस्पर्धी संघ, चीनी तायपेई, देखील त्यांचे सर्व लीग सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यांनी केनिया, नेपाळ, इराण, टांझानिया आणि पोलंडला हरवले होते आणि उपांत्य फेरीत बांगलादेशचा पराभव केला होता. मात्र, अंतिम फेरीत त्यांना भारतीय संघाच्या ताकदीसमोर टिकता आले नाही आणि त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा..!

"२०२५ चा कबड्डी विश्वचषक जिंकून देशाला अभिमान वाटल्याबद्दल आपल्या भारतीय महिला कबड्डी संघाचे अभिनंदन! त्यांनी उत्कृष्ट धैर्य, कौशल्य आणि समर्पण दाखवले आहे. त्यांचा विजय असंख्य तरुणांना कबड्डी खेळण्यासाठी, मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि उच्च ध्येये गाठण्यासाठी प्रेरणा देईल." असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

देश करतोय खेळाडूंचे कौतुक

भारतीय महिलांच्या या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशातून त्यांचे जोरदार कौतुक होत आहे. हरियाणा स्टीलर्सचे मुख्य प्रशिक्षक मनप्रीत सिंग यांनी संघाचे अभिनंदन करताना म्हटले की, "महिला संघाने अशी कामगिरी केली आहे, ज्याचा देशाला अभिमान वाटू शकतो. त्यांचा आत्मविश्वास आणि सांघिक कार्य उत्कृष्ट होते. या स्तरापर्यंत पोहोचणे किती कठीण असते, हे एक माजी भारतीय खेळाडू म्हणून मला माहीत आहे. सर्व खेळाडू आणि कर्मचाऱ्यांचे खूप-खूप अभिनंदन."

पुणेरी पलटणचे मुख्य प्रशिक्षक अजय ठाकूर यांनीही या विजयाला 'अत्यंत अभिमानाचा क्षण' असे म्हटले. ढाकामध्ये विश्वचषकाची ट्रॉफी टिकवून ठेवणे, हे दर्शवते की गेल्या काही वर्षांत महिला कबड्डीने किती प्रगती केली आहे. आगामी काळात ही गती कायम राहील आणि संघ आणखी मोठे यश मिळवेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. भारतीय महिला संघाच्या या यशाबद्दल सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+