Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ind vs ban test match : भारत- बांगलादेश यांच्यात चौथ्या दिवसाचा खेळ होईल की नाही? वाचा पावसाचा अंदाज

ind vs ban test match : भारत आणि बांग्लादेश संघात दुसरा कसोटी सामना सध्या कानपूर येथे सुरु आहे. काल तिसऱ्या दिवशी दिवसभर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. त्यात आता पावसाचे संकट सामन्यावर आहे. त्यामुळे आज चौथ्या दिवशी काय होणार सामना सुरु होणार की, पाऊस येणार हे पाहावं लागणार आहे.

सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने कानपूरमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्या खेळावर पाणी फेरले. पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ 35 षटके टाकता आली. त्यानंतर हवामान काहीसे सुधारत असतानाच दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पावसाने जोर लावला आणि सामना थांबवावा लागला. कालही सामना खेळता न आल्याने आणि आजची पावसाची स्थिती यामुळे सामना अनिर्णित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

ind vs ban test match

भारतासाठी तोटा

पहिल्या कसोटीत विजय प्राप्त केल्यानंतर दुसऱ्या कसोटीत भारताकडे एक विजयाची आघाडी होती आणि भारताचे खेळाडूही लयीत दिसत होते. त्यामुळे दुसरी कसोटी जिंकण्याचा भारताचा इरादा स्पष्ट होता पण पावसामुळे भारताच्या विजयी मनसुब्यावर पाणी फेरले असेच म्हणावे लागेल.

चाहत्यांनीही सोडली आशा

पहिल्या दिवशी खराब हवामानामुळे सामन्याला पावसाने खूप उशीर केला. तर दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी एकही सत्र झाले नाही. पहिल्या दिवशी मर्यादित खेळ पहायला मिळाला, त्यामुळे आज हवामान स्वच्छ न झाल्यास सामना अनिर्णित राहू शकतो, असे मानले जात आहे. ही परिस्थिती पाहिल्यानंतर चाहत्यांनी सामना पाहण्याची आशा सोडली आहे.

काय आहे पावसाचा अंदाज

कानपूरमध्ये दिवसभर असेच वातावरण राहील कानपूरमधील चौथ्या दिवशी स्थानिक हवामानाचा अंदाज आश्वासक आहे, अॅक्युवेदरने केवळ 3 टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि तापमान सरासरी 33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पाचव्या दिवसाचा अंदाज आणखी चांगला आहे, पावसाची फक्त 1 टक्के शक्यता आणि सरासरी तापमान 35 अंश सेल्सिअस असण्याची अपेक्षा आहे. या सकारात्मक अंदाजामुळे खेळाच्या अंतिम टप्प्यात पाऊसमुक्त खेळ होण्याची आशा आहे.

हवामानाचा अंदाज चांगला असतानाही तिसऱ्या दिवशी सामना होऊ शकला नाही, पण सामन्याच्या सुरुवातीच्या दिवशी पावसाचा जोरदार परिणाम झाला. ज्यामध्ये दुसरा दिवस पूर्णपणे वाया गेला आणि तिसरा दिवस ओल्या आउटफिल्डमुळे रद्द झाला. सकाळपासून पाऊस नसतानाही तिसऱ्या दिवशी खेळ सुरू होऊ न शकल्याने ग्रीन पार्क स्टेडियममधील ड्रेनेज व्यवस्थेची तपासणी करण्यात आली.

पहिल्या दिवशी भारताने वेगवान विकेट घेत दमदार सुरुवात केली होती. बांगलादेशची धावसंख्या 29/2 अशी झाली. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतो आणि मोमिनुल हक यांच्यातील 51 धावांच्या भक्कम भागीदारीने पाहुण्या संघाला पुन्हा सामन्यात आणले. मात्र, भारताच्या रविचंद्रन अश्विनने शांतोला 31 धावांवर बाद करून ही भागीदारी तोडली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+