Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs AUS भारताचा हर्षित राणा ठरला हिरो, ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे लोटांगण, जिंकण्यासाठी एवढे टार्गेट

IND vs AUS 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात (Third and Final ODI) ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४६.४ षटकांत केवळ २३६ धावांत गारद झाला. भारताला मालिका विजयासाठी आता ५० षटकांत २३७ धावांचे लक्ष्य गाठावे लागणार आहे.

IND vs AUS 3rd ODI

ऑस्ट्रेलियाची सलामी

मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली होती. या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या, पण मोहम्मद सिराजने ही भागीदारी तोडत भारताला पहिले यश मिळवून दिले.

मॅट रेनशॉचा संघर्ष

मधल्या फळीत मॅट रेनशॉने जबाबदारी स्वीकारत शानदार अर्धशतक (५६ धावा) झळकावले. त्याने ॲलेक्स कॅरी (२४) सोबत ५९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. रेनशॉ वगळता मिचेल मार्श (४१), मॅथ्यू शॉर्ट (३०), ट्रॅव्हिस हेड (२९) आणि कूपर कोनोली (२३) यांनी काही प्रमाणात संघर्ष केला, पण मोठी धावसंख्या उभारण्यात ते अपयशी ठरले.

Take a Poll

हर्षित राणाची तडाखेबाज कामगिरी

मागील दोन सामन्यांच्या तुलनेत भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात अत्यंत शिस्तबद्ध आणि दमदार कामगिरी केली. विशेषतः युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा हा संघासाठी 'सामन्याचा हिरो' ठरला. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळेच ऑस्ट्रेलियाचा संघ मोठा स्कोअर उभारू शकला नाही.

हर्षित राणा आज ठरला हिरो- तीन टर्निंग पाॅईंट

महत्त्वाची भागीदारी मोडली: रेनशॉ आणि ॲलेक्स कॅरी यांच्यातील ५९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी त्याने ॲलेक्स कॅरीला बाद करून तोडली.

एकूण चार बळी: राणाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडत एकूण चार महत्त्वपूर्ण बळी (विकेट्स) घेतले.

फलंदाजांवर दबाव: त्याने नियमित अंतराने विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या मधल्या आणि खालच्या फळीवर प्रचंड दबाव निर्माण केला.

हर्षित राणाव्यतिरिक्त इतर भारतीय गोलंदाजांनीही उत्कृष्ट कामगिरी केली.

गोलंदाजांना मिळालेले बळी

  • हर्षित राणा - ४
  • वॉशिंग्टन सुंदर - १
  • मोहम्मद सिराज - १
  • प्रसिद्ध कृष्णा - १
  • कुलदीप यादव - १
  • अक्षर पटेल - १

भारतीय गोलंदाजांनी आपले काम चोख बजावले आहे. आता मालिका आणि सामना जिंकण्याची संपूर्ण जबाबदारी भारतीय फलंदाजांवर आहे. २३७ धावांचे लक्ष्य आव्हानपूर्ण असले तरी, भारतीय फलंदाजीची क्षमता पाहता ते गाठले जाऊ शकते.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+