Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका! BCCI ची आशिया कपमधून माघार, पाकडे सापडले अडचणीत

Asia Cup Updates India's withdrawal from Asia Cup BCCI's decision : भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ- बीसीसीआयनं आशियाई क्रिकेट परिषदेच्या दोन प्रमुख स्पर्धांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढील महिन्यात श्रीलंकेत होणारा महिला इमर्जिंग टीम आशिया कप आणि पुरुषांच्या आशिया कप, आशिया कप आणि सप्टेंबरमध्ये भारताने आयोजित केलेला पुरुष आशिया कप याचा यात समावेश आहे.

Asia Cup Updates

एसीसीचे अध्यक्षपद आहे पाकिस्तानकडे

या निर्णयामुळे आता भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश असलेली प्रमुख स्पर्धा असलेल्या पुरुष आशिया कपच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. सध्या पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांच्या नेतृत्वाखालील एसीसी, जे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष म्हणून देखील काम करतात, त्यांच्यासमोर आता एक मोठे आव्हान आहे.

Take a Poll

भारताची कमतरता जाणवेल

पुरुष आशिया कपमध्ये बीसीसीआयची अनुपस्थिती या स्पर्धेला धोका निर्माण करू शकते, कारण भारताचा सहभाग त्याच्या व्यावसायिक यशासाठी महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे बहुतेक प्रायोजक भारतातील आहेत आणि भारत-पाकिस्तानमधील उच्च-प्रोफाइल स्पर्धा ही प्रसारकांसाठी एक मोठी संधी आहे. भारताशिवाय आशिया कपमध्ये मोठी कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सर्व भागधारकांवर परिणाम होईल.

एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्क्वी आहेत पाकिस्तानचे गृहमंत्री

आशियाई क्रिकेट परिषदेचे सध्याचे अध्यक्ष मोहसीन नक्वी आहेत, जे पाकिस्तान सरकारमध्ये गृहमंत्री देखील आहेत. याशिवाय ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख देखील आहेत. अशा परिस्थितीत, बीसीसीआयनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि एसीसीला याबद्दल माहिती दिली आहे. सूत्रांचा हवाला देत, या वृत्तात म्हटले आहे की बीसीसीआयने पाकिस्तानला एकाकी पाडण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे.

..म्हणून आम्ही खेळू शकत नाही - बीसीसीआयची भुमिका

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हटले आहे की आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख पाकिस्तानी मंत्री आहेत, आम्ही तिथे क्रिकेट खेळू शकत नाही. ही आपल्या देशाची भावना आहे. आम्ही त्यांना हे तोंडी सांगितले आहे आणि भविष्यात खेळण्याची शक्यताही कमी आहे. बीसीसीआय भारत सरकारच्या संपर्कात आहे.

याआधीही भारताने हीच घेतली होती भुमिका

भारत-पाकिस्तान तणावामुळे आशिया कपमध्ये व्यत्यय येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही 2023 मध्ये, जेव्हा पाकिस्तानने स्पर्धेचे आयोजन केले होते, तेव्हा भारताने सीमा ओलांडून प्रवास करण्यास नकार दिला होता या स्पर्धा खेळण्यास तेव्हाही अडचणी आल्या होत्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+