Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुतळे, स्मारके राजकीय सोय... महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण; राज ठाकरेंचा सत्ताधा-यांवर संताप

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बांधण्यात आले. 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकावरील महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरण झाले, केवळ आठच महिन्यांत हा पुतळा कोसळल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवभक्तांमध्ये संतापाची लाट आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

आठ महिन्यांत पुतळा कोसळतोच कसा?

राज ठाकरेंनी एक्स हॅंडलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या 8 महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती?

Raj Thackeray

शेअर केली कुसुमाग्रजांची पुतळ्यांवरील 'ती' कविता

आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील 'पाच पुतळ्यांवरची' कविता आठवली. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दामून देत आहे असं राज ठाकरेंनी लिहित ही कविता शेअर केली आहे.

पुतळे,स्मारके राजकीय सोय

राज ठाकरे पुढे पोस्टमध्ये लिहितात की, पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत.

प्रतिकांचे राजकारण करणारी व्यवस्था उद्धवस्त केली पाहिजे

पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे. ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो. असंही राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

शिवरायांच्या कार्याच्या गौरवासाठी बसवला होता पुतळा

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमार कौशल्य आणि एकूणच कार्याचा गौरव करण्यासाठी मागील वर्षी नौदल दिनाचे औचित्य साधून पूर्णाकृती पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला. 15 फूट उंचीचा चबुत-यावर आणि 28 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशी येथील रचना होती. अतिशय दिमाखात उभा असलेला हा पुतळा पर्यटकांचे तसेच शिवप्रेमीचं आकर्षण केंद्र बनला होता. सोमवारी 26 आॅगस्ट रोजी दुपारी अचानक हा पुतळा कोसळला. पुतळा कोसळल्याने साऱ्यांनाच धक्का बसला आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+