देवेंद्र फडणवीस यांच्या विजयात या व्यक्तीची महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशशी आहे कनेक्शन
Maharashtra Election Result 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ संपूर्ण निवडणुकीत चर्चेत राहिला. काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांचा पराभव करत फडणवीस यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
हा विजय फडणवीसांसाठी महाराष्ट्रातील भाजपमधील ऐतिहासिक विजय आहे. कारण 1999 मधील पहिल्या विजयानंतर विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांचा हा सहावा विजय आहे. गेल्या तीन टर्म महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयात देवेंद्र फडणवीस यांची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे.

नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघावर फडणवीस यांच्या सलग सहाव्या विजयात एका खास व्यक्तीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शैलेंद्र जैन असं या खास व्यक्तीचं नाव आहे. मध्य प्रदेशातील सागर विधानसभा मतदारसंघातील ते भाजपाचे आमदार आहेत. ज्यांनी फडणवीस यांच्या निवडणूक प्रचारात आणि निवडणुकीची रणनीती बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीचा विजय निश्चित करण्याची जबाबदारी फडणवीस यांच्याकडे असल्याने मध्य प्रदेशचे आमदार शैलेंद्र जैन यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे प्रभारी करण्यात आलं होतं.
देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीत जैन यांनी निवडणूक प्रचार प्रभावीपणे सांभाळला. मध्य प्रदेशातून चार वेळा आमदार राहिलेले आणि कैलाश विजयवर्गीय यांचे समर्थक जैन यांनी व्यापक प्रचार आणि निवडणूक व्यवस्थापनाद्वारे फडणवीसांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर भर दिला.
जैन यांची यशस्वी रणनीती
नागपुरातील शैलेंद्र जैन यांच्या अथक प्रचाराचा फडणवीस यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा आहे. जैन यांनी फडणवीस यांना पाठिंबा मिळवण्यासाठी छोट्या सभा घेऊन निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. नागपूर दक्षिण पश्चिम जागा राखण्यात भाजपच्या यशात जैन यांच्या निवडणूक प्रचार व्यवस्थापनाने महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे.
हा विजय फडणवीस यांच्या महाराष्ट्रात भाजपमधील नेतृत्वाची खात्री तर करतोच, शिवाय विविध राज्यातील भाजप नेत्यांमधील धोरणात्मक सहकार्याचे उदाहरणही देतो. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे प्रभारी शैलेंद्र जैन यांची नियुक्ती करणे ही भाजपची एक धोरणात्मक चाल होती. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपचा विजय ही पक्षासाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे, ज्यामध्ये मध्य प्रदेशसारख्या इतर राज्यांतील नेत्यांनी त्यांच्या निवडणूक रणनीतीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.












Click it and Unblock the Notifications