संकष्टी चतुर्थी २०२५: अडचणी आहेत? मनोकामना अपूर्ण आहेत? उद्या गणपती बाप्पाला करा 'हे' सोप्पे उपाय
संकष्टी चतुर्थीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. चैत्र महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी विघ्नांचा नाश करणाऱ्या गणपतीची पूजा केली जाते. विधीनुसार उपवास केला जातो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. याच दिवसासाठीचे काही खास उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पूर्ण होतात मनोकामना
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर होतात. भगवान गणेशाच्या आशीर्वादाने जीवनात सुख आणि समृद्धी राहते. महिला आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतात. या दिवशी पूजेदरम्यान काही खास वस्तू अर्पण कराव्यात. असे केल्याने सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतात असे मानले जाते.
उद्या कधी आहे मुहूर्त
हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी उद्या म्हणजेच १७ मार्च रोजी संध्याकाळी ७:३३ वाजता सुरू होत आहे. ही चतुर्थी तिथी दुसऱ्या दिवशी १८ मार्च रोजी रात्री १०:०९ वाजता संपेल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी पूजा केली जाते. अशा परिस्थितीत, भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत उद्याच पाळले जाईल.
करा हे सोप्पे उपाय
१. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजेदरम्यान बाप्पाला बेसनाचे लाडू अर्पण करावेत. असे मानले जाते की हे भगवान गणेशाला अर्पण केल्याने करिअरमध्ये नवीन उंची मिळते. तसेच जीवनातील सर्व दुःखे निघून जातात.
२. भगवान गणेशाला मोदक खूप आवडतात, म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, पूजा करताना बाप्पाला मोदक अर्पण करावेत.
३. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला मोतीचूरचे लाडू अर्पण करावेत. मान्यतेनुसार या दिवशी देवाला मोतीचूर लाडू अर्पण केल्याने वैवाहिक जीवन आनंदी राहते.
४. या दिवशी भगवान गणेशाला बुंदीचे लाडू देखील अर्पण करता येतात. हा भोग अर्पण केल्याने गणपतीचा आशीर्वाद मिळतो आणि घरातून नकारात्मकता दूर राहते.












Click it and Unblock the Notifications