Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सरकार लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांसोबत धमक्याचा बोनसही देतेय - संजय राऊतांचा हल्लाबोल

नागपूर : भाजप सरकार एकीकडे एक देश एक निवडणूक राबवायची भाषा करते आणि आणि दुसरीकडं त्यांना एकाचवेली चार राज्यात निवडणुका घेता येत नाही. राज्यातील सत्ताधाऱ्यांना सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळ मिळावा म्हणूनच महाराष्ट्रात निवडणुका लांबवण्याचं हे कारण असल्याचंही संजय राऊत यांनी सांगत टीका केली.

Sanjay Raut on BJP PM Modi s reasons for delaying assembly elections in Maharashtra

नेमके काय म्हणाले संजय राऊत?

झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होत नसल्याबद्दल शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत म्हणाले, "तुम्ही झारखंडमधून बातम्या येत असल्याचं पाहिलं असेल... ते हेमंत सोरेनला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. झारखंडमध्ये निवडणुका जाहीर झाल्या असत्या तर महाराष्ट्रातही अशा गोष्टी घडल्या नसत्या एकीकडे ते एका देशाच्या निवडणुकांबद्दल बोलतात, तर दुसरीकडे ते एकाच वेळी चार राज्यांत निवडणुका घेऊ शकत नाहीत.

...तर अंकूश लागला असता

संजय राऊत म्हणाले, जर झारखंडमध्ये ज्या बातम्या येत आहेत, तिथं पाहा काय होत आहे. हेमंत सोरेन यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तिथं त्यांचं एक मजबूत सरकार आहे. या सरकारला पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. मी हे आजच वाचलं जर निवडणूका घोषित केल्या असत्या तर तिथं आचारसंहीतेमुळे अशा कारनाम्यावर अंकूश लागला असता.

हेतू साध्य करण्यासाठी निवडणूक लांबवली

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातही जे लोक सत्तेत बसले आहेत. त्यांना अजून सरकारी तिजोरी खाली करण्यासाठी वेळ मिळावा, त्यांचे हेतू साध्य व्हावे यासाठी निवडणुका लांबवण्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा झाली नाही. वन नेशन वन इलेक्शनची गोष्ट ते करतात पण एकाचवेळी निवडणुका ते घेऊ शकत नाही.

Sanjay Raut on BJP PM Modi s reasons for delaying assembly elections in Maharashtra

महायुती सरकार धमक्या देतेय..

संजय राऊत म्हणाले, महायुती सरकार महिलांना दीड हजार रुपयांसोबत धमक्या देत आहे. कार्यक्रमाला आले नाही तर पैसे मिळणार नाही असा दम दिला जात आहे. हे म्हणजे दीड हजार आणि धमकीचा बोनस आहे, असा हा प्रकार आहे.

..तर लोकसभेला आणखी 25 ते 30 जिंकल्या असत्या

संजय राऊत म्हणाले, "तीन एमव्हीए पक्ष (शिवसेना (यूबीटी), एनसीपी-एससीपी, काँग्रेस) राज्य सरकार बदलण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. उद्धव ठाकरे त्याच उद्देशाने बोलले, कोणीही असो. मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून नामांकन केले आहे, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ... मुख्यमंत्री पदाचा उमेदवार पाहून लोक त्यांचे मत बदलतात, जर राहुल गांधी यांना वेळेवर पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले असते तर आम्ही (भारतीय गट) आणखी 25 ते 30 जिंकले असते. लोकसभा निवडणुकीत जागा.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+