Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पिकांचेच नव्हे तर अनेक पिढ्यांचे नुकसान; समृद्धीतून कमावलेला पैसा बाहेर काढा; संजय राऊत कडाडले

Sanjay Raut on Marathwada floods and Target to eknath shinde : महाराष्ट्रातील मराठवाडा भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचेच नव्हेत तर येणाऱ्या अनेक पिढ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी फडणवीस सरकारला त्वरीत मदत करण्याची मागणी केली. राज्य सरकारवर गंभीर आरोप करत केंद्र सरकारकडे मदतनिधीची मागणी केली आहे. मराठवाड्यातील पिकांच्या नुकसानीाबाबत संजय राऊत यांनी संवेदना व्यक्त केल्या.

Sanjay Raut attacks Fadnavis government

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. याशिवाय, माती आणि शेतजमिनी मोठ्या प्रमाणात वाहून गेल्या आहेत. संजय राऊत यांनी ही केवळ शेतीच्या नुकसानीची घटना नाही, तर शेतकऱ्यांच्या पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान करणारी एक मोठी आपत्ती असल्याचे म्हटले आहे. ज्या मातीवर शेती केली जाते, तीच माती शिल्लक नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे जगण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

सरकारी तिजोरीत पैसा नाही, मदत कशी मिळणार?

संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, सध्याच्या सरकारकडे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पैसा नाही. या सरकारवर नऊ ते दहा लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्यामुळे ते शेतकऱ्यांच्या कुटुंबांना कशी मदत देणार, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. राऊत यांनी मिंधे गटाला आव्हान दिले आहे की, जर त्यांच्याकडे मदत करण्यासाठी पैसे असतील, तर नगरविकास खात्याने लुटलेले पैसे शेतकऱ्यांना द्यावे.

केंद्र सरकारकडे १० हजार कोटींची मदतनिधीची मागणी

संजय राऊत यांनी माहिती दिली की, उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे मराठवाड्यासाठी १० हजार कोटी रुपयांच्या विशेष मदतीची मागणी केली आहे. या निधीचा उपयोग पिकांचे नुकसान भरून काढणे, शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे आणि वाहून गेलेल्या जमिनी व घरांची पुनर्बांधणी करण्यासाठी केला जाईल. या परिस्थितीत उद्धव ठाकरे स्वतः मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि तेथील नुकसानीची पाहणी करणार आहेत.

मदतकार्यात राजकारण आणि स्वार्थाचा आरोप

मदत वाटप करताना भगव्या पिशव्यांवर स्वतःचे आणि पक्षाचे फोटो छापून मदत वाटल्याबद्दल संजय राऊत यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. लोकांच्या दुःखाचा फायदा घेऊन अशा प्रकारे स्वतःची जाहिरात करणे हे निर्लज्जपणाचे आणि अमानुषतेचे लक्षण असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. ही मते मागण्याची वेळ नसून, सरकारने तातडीने संवेदनशीलतेने मदत कार्य करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेत्याच नाही त्यामुळे आवाज कोण उठवणार!

संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद नसल्याच्या मुद्द्यावरही सरकारवर टीका केली आहे. संकटकाळात जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम विरोधी पक्षनेत्याचे असते. सध्याच्या परिस्थितीत विरोधी पक्षनेता नसल्यामुळे जनतेचा आक्रोश दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी महाराष्ट्राच्या जनतेविरुद्ध कट रचला आहे. अशा प्रकारे विरोधी पक्षाची भूमिका डावलणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे.

या अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या वादळात शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील या संघर्षात शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल का, हा खरा प्रश्न आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+