7 सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात; ‘ही' 6 कामं करु नका, अन्यथा पितर...

हिंदू धर्मशास्त्रानुसार, उद्यापासून म्हणजेच 7 सप्टेंबर 2025 पासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे. सनातन धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. अशी श्रद्धा आहे की, या 15 दिवसांच्या काळात आपले पितर आपल्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात. त्यांच्या आत्म्यांना शांती मिळावी आणि त्यांना मोक्ष मिळावा यासाठी श्राद्ध, तर्पण, पूजा-अर्चा आणि दानधर्म केला जातो. पितरांचा आशीर्वाद मिळाल्यास कुटुंबात सुख-समृद्धी नांदते आणि वंश वाढीस लागतो, असे मानले जाते.

pitru paksha 2025 hindu rituals

वैदिक शास्त्रांनुसार, पितृपक्षात काही विशिष्ट नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. या नियमांचे पालन न केल्यास पितर नाराज होऊ शकतात, ज्यामुळे कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे, या 15 दिवसांत काय करावे आणि काय करू नये, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये?

पितृपक्षातील प्रत्येक दिवस पितरांना समर्पित असतो. या काळात काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.

  • शुभ कार्यांना मनाई: शास्त्रांनुसार, पितृपक्षात कोणतेही शुभ किंवा मांगलिक कार्य जसे की, विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, किंवा कोणत्याही नवीन वस्तूंची खरेदी करणे टाळावे. हा काळ पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी असतो.
  • कटू वाणीचा वापर टाळा: या काळात कोणाशीही खोटे बोलू नका. तसेच, कोणत्याही व्यक्तीसाठी अपशब्द वापरू नका. असे मानले जाते की, या 15 दिवसांत आपल्या आजूबाजूला पितरांचा वास असतो, त्यामुळे कोणत्याही नकारात्मक गोष्टी टाळल्या पाहिजेत.
  • विशिष्ट पदार्थांचे सेवन वर्जित: पितृपक्षाच्या काळात मांसाहारी पदार्थ, तसेच कांदा, लसूण, मुळा आणि मसूर डाळ यांसारख्या तामसी पदार्थांचे सेवन करणे वर्जित मानले जाते. यासोबतच शिळे अन्न आणि मद्यपान टाळावे.
  • पांढऱ्या तिळाचा वापर टाळा: पितरांचे तर्पण करण्यासाठी काळ्या तिळाचा वापर करणे शुभ मानले जाते. चुकूनही पांढऱ्या तिळाचा वापर करू नका. तसेच, श्राद्धाचे जेवण बनवण्यासाठी लोखंडाच्या भांड्याचा वापर करणे टाळावे. लोखंड नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते असे मानले जाते.
  • अन्नाचा अपमान करू नका: पितरांसाठी बनवलेले पदार्थ आधी चाखू नका. तसेच, या काळात तुमच्या दारात जर गाय,ब्राह्मण, कुत्रा,गरीब किंवा भिकारी व्यक्ती आल्यास त्यांचा अपमान करू नका. त्यांना आदरपूर्वक भोजन द्या, कारण पितर कोणत्याही रूपात आपल्या भेटीला येऊ शकतात असे मानले जाते.
  • श्राद्धाची योग्य वेळ: पितरांच्या तर्पणासाठी दुपारची वेळ उत्तम मानली जाते. त्यामुळे ब्रह्म मुहूर्तात श्राद्ध विधी करू नयेत. शास्त्रांनुसार, दुपारच्या वेळी पितर पृथ्वीवर येतात, त्यामुळे या वेळेत केलेले तर्पण आणि श्राद्ध त्यांना थेट प्राप्त होते.

पितृपक्षाचे महत्त्व आणि काही महत्त्वाचे विधी

पितृपक्षात, श्राद्ध आणि तर्पण हे दोन मुख्य विधी केले जातात. श्राद्ध म्हणजे आपल्या पितरांना भोजन अर्पण करणे. वेगवेगळ्या तिथींवर कुटुंबातील सदस्यांनुसार श्राद्ध केले जाते. उदाहरणार्थ, ज्यांचा मृत्यू एकादशीला झाला असेल त्यांचे श्राद्ध एकादशीला केले जाते. मातृनवमीच्या दिवशी सर्व मातांचे श्राद्ध केले जाते. तर, दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींचे श्राद्ध चतुर्दशीला केले जाते.

या काळात दानधर्म करणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. गरीब आणि गरजूंना अन्न, वस्त्र आणि इतर वस्तूंचे दान केल्यास पितर संतुष्ट होतात. पितृपक्षात कुटुंबात शांतता आणि सकारात्मकता राखणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून पितरांचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहील.

टीप : वरील सर्व माहिती आम्ही केवळ माहिती म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून वनइंडिया मराठी कोणताही दावा करत नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+