Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Navratri 2024 : ही.. आहेत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे, जाणून घ्या कुठे आहेत, इतिहास आणि महत्व

Navratri 2024 : आजपासून नवरात्री महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. नऊ दिवस उपास-तापास आणि पुजाविधींसह दांडीयाची धूम सुरु हत आहे. या पार्श्वभुमीवर देवी शारदेची आराधना महत्वाची मानली जाते. महाराष्ट्रात देवींची या काळात मनोभावे पुजा-अर्चा केली जाते यातच अनेक भक्तगण महाराष्ट्रातील साडेतीन पीठ असलेल्या देवींच्या मंदिरात दर्शनासाठी जातात आपण या लेखात महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठ कोणती, ती कुठे आहेत त्यांची महत्व काय हे जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे आहेत . यात प्रामुख्याने चार देवीची मंदिरे आहेत. यामध्ये महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजा भवानी मंदिर, नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील रेणुका मंदिर, नाशिक जिल्ह्यातील वणीचे सप्तशृंगी मंदिर ही होय. यातील सप्तश्रृंगी देवी शक्तीचे अर्धे शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते.

Navratri 2024

माहिती आणि महत्व

महालक्ष्मी, कोल्हापूर

कोल्हापुर , महाराष्ट्र , येथे असलेले महालक्ष्मी जिला अंबाबाई म्हणूनही ओळखले जाते, मंदिर स्कंद पुराणात सूचीबद्ध केलेल्या 18 महाशक्ती पीठांपैकी एक आहे आणि हिंदू धर्मातील विविध पुराणानुसार 52 शक्तीपीठांपैकी एक आहे . शक्तीपीठ हे शक्तीशी संबंधित स्थान आहे. हे ते ठिकाण आहे जिथे माता सतीचे 3 डोळे पडले होते. कोल्हापूर शक्तीपीठ हे अशा सहा ठिकाणांपैकी एक असल्याने विशेष धार्मिक महत्त्व आहे जिथे एखादी व्यक्ती इच्छांपासून मुक्ती मिळवू शकते किंवा ती पूर्ण करू शकते असा विश्वास आहे. कोल्हापूर पीठाला करवीर पीठ किंवा श्रीपीठम असेही म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातून दरवर्षी लाखो भाविक मंदिराला भेट देतात.

तुळजाभवानी, तुळजापूर

तुळजा भवानी मंदिर हे देवी पार्वतीला समर्पित हिंदू मंदिर आहे . देवी पार्वती आपल्या तुळजाभवानी रूपात येथे वास्तव्य करते. तिला आदिशक्ती म्हणूनही ओळखले जाते. ती भारताची संरक्षक देवी, कुलस्वामीनी आहे. हे पीठ महाराष्ट्रातील धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूर येथे आहे आणि 51 शक्तीपीठांपैकी एक मानले जाते . हे सोलापूरपासून 45 किमी अंतरावर आहे . मंदिराची बांधणी इ.स. 12वे शतकात झालेली आहे असे सांगितले जाते.

रेणुकामाता, माहूर

रेणुकामातेची महाराष्ट्रात प्रामुख्याने पूजा केली जाते ."रेणू" म्हणजे "परमाणू किंवा विश्वाची माता" होय.तिची आंध्र प्रदेश , हिमाचल प्रदेश , कर्नाटक , तामिळनाडू या दक्षिण भारतीय राज्यांमध्ये देखील पूजा केली जाते. महाराष्ट्रातील माहूर येथील रेणुकाचे मंदिर हे शक्तीपीठांपैकी एक मानले जाते . रेणुका मातेचे आणखी एक मंदिर कोकणात आहे , ज्याची पद्माक्षी रेणुका म्हणूनही पूजा केली जाते.

सप्तशृंगीदेवी, नाशिक

सप्तश्रृंगी हे महाराष्ट्रातील नाशिकपासून साठ किलोमीटर अंतरावर असलेले तीर्थक्षेत्र आहे . हिंदू परंपरेनुसार , सप्तशृंगी निवासिनी देवी सात पर्वत शिखरांमध्ये वास करते. म्हणजेच सप्त म्हणजे सात आणि श्रुंग म्हणजे शिखरे होय. हे भारतातील नाशिकजवळील नांदुरी , कळवण तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे . या ठिकाणी दररोज भाविक मोठ्या संख्येने येतात.हे मंदिर महाराष्ट्रातील " साडेतीन शक्तीपीठांपैकी एक " म्हणूनही प्रसिद्ध आहे . भारतीय उपखंडातील 51 शक्तीपीठांपैकी हे मंदिर देखील एक आहे आणि हे असे स्थान आहे जिथे सतीच्या (भगवान शिवाची पहिली पत्नी ) अंगांपैकी एक, तिचा उजवा हात खाली पडल्याची नोंद आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी त्याचे अर्धे शक्तिपीठ आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+