Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'एक है तो सेफ है!' PM मोदींची नवी घोषणा, म्हणाले- काँग्रेस ओबीसींचा द्वेष करतेय, जातीत भांडण लावतेय

Narendra Modi Nashik Sabha : काँग्रेसला सहन होत नाही की, एक ओबीसी खालच्या जातीतील एक व्यक्ती देशाचा पंतप्रधान कसा झाला. त्यामुळे कॉंग्रेस जातीजातीत वाद निर्माण करत आहे. ओबीसींचा द्वेष करण्याचे काम कॉंग्रेसने केला आहे, महाविकास आघाडीवाल्यांपासून सावध रहा, एकत्र रहाल तर सुरक्षित रहाल, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. नाशिकमध्ये आय़ोजित प्रचारसभेत नरेंद्र मोदी बोलत होते.

नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि घटकपक्ष असेल तर घोटाळेच होणार आहे. राज्यात तुम्ही यांना पापं करु देणार का? संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलं आहे, ती ऑल इंडिया नाही, ती परजीवी आहे. पायघड्यांवरच ती जिवंत आहे. बिहार, झारखंड अशा राज्यात दुसऱ्यासोबतच निवडणुका लढत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

Narendra Modi

नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही जनतेसमोर आपली कामं दाखवत निवडणुकीत जात असतो मात्र काँग्रेसकडे आता एकच पर्याय आहे. काँग्रेसची खोटं बोलण्याची दुकान आहे. काँग्रेस आणि चेल्यांनी हे दुकान महाराष्ट्रात लावलंय. कर्नाटक, हिमाचलमध्ये हेच केलं आणि तिथे काय झालं? निवडणुका संपल्या आणि दुकान बंद झालं तेव्हा केलेल्या गोष्टी पूर्ण नाही झाल्या. सरकार चालवण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. जनतेवर कर लादला जातोय. जनता यांची खरी खोटी जाणते.

नरेंद्र मोदी म्हणाले की, महायुतीचं घोषणापत्र एका बाजूला आणि दुसरीकडे मविआचे घोटाळा पत्र आहे. काँग्रेस आणि घटकपक्ष असेल तर घोटाळेच होणार आहे. राज्यात तुम्ही यांना पापं करु देणार का? संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलं आहे, ती ऑल इंडिया नाही आहे ती परजीवी आहे. पायघड्यांवरच ती जीवंत आहे. बिहार, झारखंड अशा राज्यात दुसऱ्यासोबतच निवडणुका लढत आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी काँग्रेसने आपला हत्यार चालवलं आहे. एससी, एसटी ओबीसींची एकता तोडा आणि राज्य मिळवा, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

महायुतीमुळे राज्याची गती

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकला माझा नमस्कार. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पहिल्या दिवशी मला नाशकात येण्याचे सौभाग्य मिळाले. अयोध्येत प्राणप्रतिष्ठा आधी 11 दिवसांच्या अनुष्ठानाची माझी सुरुवात नाशिकमधून झाली होती. काळाराम मंदिरात मला सेवेचा लाभ मिळाला. विकसित महाराष्ट्र, भारतासाठी नाशिकचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. मी पाहतोय नाशकात जनसमूह, महाराष्ट्र बोलतोय भाजप महायुती आहे तर गती आहे, राज्याची प्रगती आहे.

ओबीासींची महाराष्ट्रात 38 टक्के लोकसंख्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत, 'एक हैं ते सुरक्षित हैं' (संयुक्त असल्यास, आम्ही सुरक्षित आहोत) ही नवी घोषणा दिली आहे, जी इतर मागासवर्गीय (OBC) - यांच्याशी जोरदार प्रतिध्वनी करते. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या जवळपास 38 टक्के लोकसंख्या आहे. ओबीसी मतदारांमध्ये त्यांचे हक्क आणि प्रभाव सुरक्षित ठेवण्यासाठी एकता ही गुरुकिल्ली म्हणून सादर करून त्यांच्या समर्थनाची गोळाबेरीज करण्यासाठी भारतीय जनता पक्ष (BJP) च्या सुसंघटित मोहिमेचा हा नारा आहे.

ओबीसींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पावले

ओबीसी समाजातील एकजुटीचे महत्त्व अशा वेळी अधोरेखित करते जेव्हा राजकीय दावे जास्त असतात आणि आगामी निवडणुकांमध्ये आपली शक्यता वाढवण्यासाठी भाजपचा व्होटबँकेचा मोठा वाटा मिळवण्याचा हेतू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या रणनीतीचा उद्देश पक्षाला ओबीसींचा सर्वात विश्वासार्ह सहयोगी म्हणून स्थान देणे आहे, ज्यामध्ये लक्षणीय बदल आणि विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल. राज्यातील मतदारांमध्ये ओबीसी मतदारांचा एवढा मोठा भाग असल्याने भाजप समाजाच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ठोस प्रयत्न करत आहे.

'एक हैं तो सेफ हैं' घोषणा सुरक्षिततेसोबतच विकासापर्यंत

'एक हैं तो सेफ हैं' ही घोषणा केवळ कॅचफ्रेजपेक्षा अधिक आहे. हे संदेश देते की भाजपच्या नेतृत्वाखाली एकजूट ओबीसी समुदायांना नोकरीच्या सुरक्षिततेपासून सामाजिक विकासापर्यंत आणि वर्धित राजकीय प्रतिनिधित्वापर्यंत मूर्त लाभ देईल. स्वत: ओबीसी पार्श्वभूमीचे असलेले पंतप्रधान मोदी यांनी सातत्याने उपेक्षित समुदायांना सशक्त करण्याच्या गरजेवर भर दिला आहे आणि भाजपला ओबीसी कारणासाठी वचनबद्ध पक्ष म्हणून स्थान दिले आहे. हा संदेश महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांमध्ये आणि मतदारांमध्ये जोरदारपणे गुंजत आहे, ज्यांना असे वाटते की भाजपच्या शासनात समाजाचे कल्याण सर्वोत्तम आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रमुख ओबीसी नेते मेळाव्यात घोषणाबाजी करत आहेत, पक्षाचे नेतृत्व ओबीसींना केवळ प्रतिनिधित्व नाही तर सशक्त बनवण्याची खात्री करेल यावर भर दिला आहे.

डबल इंजिनमध्ये डबल विकास- नरेंद्र मोदींची ग्वाही

महाराष्ट्र विकास करतोय. देश नवे रेकोर्ड बनवतोय. देशात गरिबांची चिंता करणारं हे सरकार आहे. गरीब पुढे जातो तेव्हा देश पुढे जातो. काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी गरीबी हटाओचा नारा दिला. मात्र, लोकांच्या पदरी काही पडलं नाही. 10 वर्षात 25 कोटी लोकं गरिबीतून बाहेर आले आहेत. हे शक्य झालं कारण मोदी की नियत सही है. मोदी सेवक बनून काम करतो. हे शक्य झालं कारण गरीबी विरोधातली लढाई सर्वांनी लढली. 50 लाखाहून अधिक महिलांना उज्ज्वला योजनांचे गॅस कनेक्शन आहेत. नल-जल सुविधा मिळाली आहे. 7 कोटी लोकांना अन्नधान्य मिळतंय. गरिबांसाठी चांगले काम होत आहे, ही कामे पुढे सुरु ठेवण्यासाठी महायुती सरकार बनवणं गरजेचं आहे. डबल इंजिनमध्ये विकास डबल होतो. पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळतोय. वर्षाला 12 हजार रुपयांची मदत मिळत आहे. महाराष्ट्रात पुन्हा सरकार स्थापन होणार तेव्हा ही मदत 15 हजार रुपयांची केली जाणार आहे.

नाशिक सशक्त भारतात महत्त्वाची भूमिका बजावतोय

सोयाबीन कापूस आणि दूध उत्पादकांना देखील मदत केली गेली आहे. देशाचा रुपया विदेशात गेला तो आता शेतकऱ्यांना मिळतोय त्यांना जातोय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना समजतो, धोरण आपण बदलली आहेत. महाराष्ट्र वेगानं पुढे जाणं गरजेचं आहे. महाराष्ट्र पुढे जाईल तेव्हा देश पुढे जाईल. मागील अडीच वर्षात ते महायुतीने दाखवलं आहे. अनेक प्रकल्प बनवण्यात महाराष्ट्र पुढे आहे. तंत्रज्ञानात निधी येतोय.

मात्र सरकार आले नाही तर प्रगती होईल का? महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराचे अवसर मिळणार का? आपण खूप मागे जाऊ. मेट्रो थांबवली, समृद्धी महामार्ग थांबवण्याची कामं केली, अटल सेतूमध्ये अडथळा आणला. प्रकल्प थांबवण्यात मविआ आघाडीवर आहे. आघाडी वाल्यांना सरकारपासून दूर ठेवा. महायुती सरकारनं विकासाच्या अजेंड्यावर नाशिकला देखील मोठं महत्त्व मिळालं आहे. हायवे बनत आहे, वाहतूक व्यवस्था होत आहे. 2026 च्या कुंभमेळ्यात देखील याचा फायदा होईल. नाशिकमधील आयटी पार्क रोजगार तयार करेल. नाशिक डिफेन्स क्षेत्रात मोठं केंद्र देखील बनतोय. नाशकात सुरक्षेची उपकरणं बनवली जात आहेत. नाशिक सशक्त भारतात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. काँग्रेस आणि आघाडीवाले लोकं आहेत, ते देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. डिफेन्समध्ये कमकुवत करण्यासाठी एचएएलसंदर्भात खोटा प्रचार केला. धरणे आंदोलन केले, कर्मचाऱ्यांना भडकवले. मात्र एचएएल रेकॉर्ड ब्रेक कामं करत आहे. नाशिक त्याचे परिणाम बघत आहे.

हीच आंबेडकरांना खरी श्रद्धांजली

काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना कोणाचीच पर्वा नाही. रिकाम्या पानांची संविधानाची प्रत घेऊन फिरतात. संविधानाची गोष्ट येते तेव्हा उलट्याच गोष्टी करतात. 75 वर्षात आंबेडकर यांचे संविधान जम्मू काश्मीरात लागू होऊ दिले नाही. काँग्रेस हे पाप होते. कलम 370 ची भिंत उभी केली होती. भाजपा एनडीएनं हे हटवलं आणि एक देश एक संविधान लागू केलं. माझी हीच आंबेडकरांना खरी श्रद्धांजली आहे. भारताचे संविधान जम्मू काश्मिरीत लागू झाले तेव्हा सर्व देश आनंदी झाला होता. तुम्हाला आनंद झाला. मात्र काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्यांच्या पोटात दुखायला लागले. दोन-तीन दिवस आधी काँग्रेस आणि साथीदारांनी 370 लागू करण्यासाठी गोंधळ घातला. जम्मू काश्मीरमध्ये आंबेडकरांचे संविधान हटवले जावे हे यांना पाहिजे. दलित, वाल्मिकी समाजाचे आरक्षण काढावं असं त्यांना वाटतंय, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+