मोठी बातमी : मुलाचे अपहरण झाले की आणखी काय..? तानाजी सावंतांनी पत्रकार परिषदेत दिली मोठी माहिती
माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याचे अपहरण झाल्याच्या बातम्यांनी काही तासांपूर्वी खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणात स्वतः तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत, या सगळ्या प्रकरणाचा खुलासा केलाय.

नेमके काय होते प्रकऱण?
सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन आला. त्यांनी तानाजी सावंत यांच्या मुलाला कुणीतरी घेऊन गेल्याचे सांगितले. त्यानंतर तातडीने पोलिस यंत्रणा सतर्क झाली. माहिती घेतली असता तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज हा विमानाने पुण्याला गेल्याचे समजले. सिंहगड रोड पोलिस ठाण्यात याप्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असल्याचेही रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.
उडाली एकच खळबळ
पोलिसांना फोन आल्यानंतर ही बातमी महाराष्ट्रभर पसरली. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. तानाजी सावंत यांच्या मुलाचे कुणी व कशासाठी अपहरण केले, ही चर्चा सुरु झाली. मात्र त्यानंतर तातडीने तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा खुलासा केला.
काय म्हणाले सावंत?
ऋषीराज बँकॉककडे खासगी विमानाने निघाला होता. आता रात्री ९ वाजेच्या सुमारास ऋषीराज सावंत पुणे विमानतळावर दाखल झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, तानाजी सावंत यांनी तातडीने या प्रकरणात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, माझा मुलगा ऋषीराज हा पुण्यावरुन विमानाने गेला आहे. त्याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परंतु तो बेपत्ता झालेला नाही किंवा त्याचे अपहरण झालेले नाही. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र आहेत. माझ्या घरातील पद्धत अशी की कोणी कुठेही गेले तरी एकमेकांना सांगून जाते. ऋषीराज मला सांगितल्याशिवाय कुठे जात नाही. परंतु तो दुपारपासून घरात नसल्याने व त्याने कुणालाही काहीच न सांगितल्याने चिंता वाढली होती. तो दुसऱ्याच्या गाडीने गेल्याने व कुणालाही फोनसुद्धा न केल्याने आम्ही गडबडलो होतो. आम्ही चिंताग्रस्त झाल्यामुळे पोलिसांना कळवले आणि तपास सुरु झाला आहे, असे सावंत यांनी स्पष्ट केले.
-
विश्वविजेत्या इंडियाचे 'बाप्पा'ला साकडे! सिद्धिविनायकाच्या चरणी T20 वर्ल्डकप ट्रॉफीसह गंभीर-सूर्या! -
अदानी समूहाचा मोठा निर्णय: देशात उभारणार 300 शाळा, 30 रुग्णालये; 60 हजार कोटींची गुंतवणूक -
Devendra Fadnavis : गॅस टंचाईची भीती हा काँग्रेसचा कुटील डाव; देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप -
Eid ul fitr 2026 wishes marathi hindi: इदनिमित्त खास मराठी-हिंदी 20 शुभेच्छा संदेश वाचा आणि शेअर करा -
आजचे राशिभविष्य 15 मार्च 2026 : 'या' राशींच्या नशिबात राजयोग! कोणाला मिळणार पैसा आणि कोणाला यश? वाचा -
IPL 2026 : मैदानावरचा शेवटचा 'हेलिकॉप्टर शॉट'? आयपीएलनंतर धोनीसह 'हे' 5 दिग्गज घेणार निवृत्ती -
इराण-इस्त्रायल युद्धावर RSSने मांडली भूमिका; सरकार्यवाह होसबळे यांनी मोदी सरकारचे केले समर्थन! -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
Baramati Bypoll 2026 : सुनेत्रा पवार रिंगणात, पण 'बिनविरोध'ची शक्यता धूसर? जाणून घ्या नेमकं समीकरण -
चांदीच्या दरात मोठी घसरण! इराण युद्धाच्या सावलीत किमती कोसळल्या; जाणून घ्या आजचे ताजे दर! -
इराण-इस्त्रायल युद्धात उत्तर कोरियाची उडी: इराणवरील हल्ल्याचा निषेध,किम जोंग-उनांनी डागले मिसाईल! -
weather update : महाराष्ट्राचा पारा 41.8 अंशांवर! आजपासून 'या' ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार









Click it and Unblock the Notifications