‘ओबीसी आमच्यात आलाय'; मनोज जरांगे पाटील यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या शासन निर्णयावर (GR) जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर थेट टीका केली असून, मराठा समाज आरक्षणात गेला नसून, ओबीसी समाज मराठ्यांमध्ये आल्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण दावा केला आहे. जरांगे पाटील यांच्या या भूमिकेमुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या वादाला एक नवीन दिशा मिळाली आहे.

मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळाला
मुंबईतील उपोषण आणि प्रचंड आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात जीआर जारी केला. याबद्दल बोलताना जरांगे पाटील म्हणाले, "आमचा हक्क आम्हाला मिळाला आहे, बाकी मराठा नेते माझ्या विरोधात का जातात हे मला माहिती नाहीये. आमचा हक्क आहे आणि मी तो मिळवलाय."
ते पुढे म्हणाले, "मराठा समाज हा आधीपासूनच सर्वच आरक्षणात होता. आपल्या लोकांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, आपण कोणासाठी आणि कशासाठी संघर्ष करतोय. माझे लाखो तरुण मुंबईला गेले आणि विजय घेऊनच परत आले. हे आता केवळ लेखी नाहीये, याला जीआर म्हणतात."
'ओबीसी आमच्यात आलाय'
जरांगे पाटील यांनी सर्वात मोठा आणि वादग्रस्त दावा करत म्हटले की, "आम्ही ओबीसीत गेलो नाही, ओबीसी आमच्यात आलाय. आमचे मन मोठे होते, आमच्या पूर्वजांचे. आम्ही 1881 पासून आरक्षणातच होतो. आम्ही अगोदरचेच आहोत. आता आमच्या एक गोष्ट लक्षात आली की, आजच्या लेकरांना प्रगती करायची असेल, तर आरक्षण घ्यावे लागणार आहे आणि आम्ही ते टप्प्यात टप्प्यात मिळवले आहे." त्यांच्या या वक्तव्यामुळे ओबीसी समाजात अधिक संताप निर्माण होण्याची शक्यता आहे.
सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, जीआर आधीच निघाला आहे, आता फक्त त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना म्हटले, "छगन भुजबळ यांना जीआर चांगला कळतो. त्यांनी अनेक मोठे पक्ष आणि बहुमताच्या सत्ता हाताळल्या आहेत. कॅबिनेटमध्ये असल्यामुळे त्यांना जीआरचा चांगला अभ्यास आहे."
सरकारने काढलेल्या या जीआरमुळे ओबीसी समाजात नाराजी आहे आणि त्यांचे नेते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमिती देखील गठीत केली आहे. या समितीमध्ये मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे, आणि संजय राठोड यांसारख्या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. मात्र, जरांगे पाटील यांच्या या नवीन दाव्यामुळे दोन्ही समाजातील दुरावा आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, मराठा आणि ओबीसी समाजाला एकत्र आणण्याचे आणि शांतता राखण्याचे आव्हान सरकारसमोर उभे आहे.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस










Click it and Unblock the Notifications