Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

‘ओबीसी आमच्यात आलाय'; मनोज जरांगे पाटील यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा दावा

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या शासन निर्णयावर (GR) जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर थेट टीका केली असून, मराठा समाज आरक्षणात गेला नसून, ओबीसी समाज मराठ्यांमध्ये आल्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण दावा केला आहे. जरांगे पाटील यांच्या या भूमिकेमुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या वादाला एक नवीन दिशा मिळाली आहे.

manoj jarange patil obc reservation maratha community

मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळाला

मुंबईतील उपोषण आणि प्रचंड आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात जीआर जारी केला. याबद्दल बोलताना जरांगे पाटील म्हणाले, "आमचा हक्क आम्हाला मिळाला आहे, बाकी मराठा नेते माझ्या विरोधात का जातात हे मला माहिती नाहीये. आमचा हक्क आहे आणि मी तो मिळवलाय."

ते पुढे म्हणाले, "मराठा समाज हा आधीपासूनच सर्वच आरक्षणात होता. आपल्या लोकांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, आपण कोणासाठी आणि कशासाठी संघर्ष करतोय. माझे लाखो तरुण मुंबईला गेले आणि विजय घेऊनच परत आले. हे आता केवळ लेखी नाहीये, याला जीआर म्हणतात."

'ओबीसी आमच्यात आलाय'

जरांगे पाटील यांनी सर्वात मोठा आणि वादग्रस्त दावा करत म्हटले की, "आम्ही ओबीसीत गेलो नाही, ओबीसी आमच्यात आलाय. आमचे मन मोठे होते, आमच्या पूर्वजांचे. आम्ही 1881 पासून आरक्षणातच होतो. आम्ही अगोदरचेच आहोत. आता आमच्या एक गोष्ट लक्षात आली की, आजच्या लेकरांना प्रगती करायची असेल, तर आरक्षण घ्यावे लागणार आहे आणि आम्ही ते टप्प्यात टप्प्यात मिळवले आहे." त्यांच्या या वक्तव्यामुळे ओबीसी समाजात अधिक संताप निर्माण होण्याची शक्यता आहे.

सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी

मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, जीआर आधीच निघाला आहे, आता फक्त त्याची अंमलबजावणी होणार आहे. त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना म्हटले, "छगन भुजबळ यांना जीआर चांगला कळतो. त्यांनी अनेक मोठे पक्ष आणि बहुमताच्या सत्ता हाताळल्या आहेत. कॅबिनेटमध्ये असल्यामुळे त्यांना जीआरचा चांगला अभ्यास आहे."

सरकारने काढलेल्या या जीआरमुळे ओबीसी समाजात नाराजी आहे आणि त्यांचे नेते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमिती देखील गठीत केली आहे. या समितीमध्ये मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे, आणि संजय राठोड यांसारख्या महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. मात्र, जरांगे पाटील यांच्या या नवीन दाव्यामुळे दोन्ही समाजातील दुरावा आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, मराठा आणि ओबीसी समाजाला एकत्र आणण्याचे आणि शांतता राखण्याचे आव्हान सरकारसमोर उभे आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+