Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कुणीतरी सांगा, आमचं चुकलंय तरी कुठे, मराठ्यांना उठाव हा करावाच लागेल- जरांगे पाटलांचा एल्गार

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दसरा मेळावा आज पार पडत आहे. या मेळाव्यात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले.

Manoj Jarange Patil

माझा समाज या राज्यातील जनतेसाठी झिजलाय. स्वतः या समाजाने दुसऱ्यांसाठी त्याग दिलाय. आमचा निर्णय चुकलायं कुठला कुठे, आम्ही श्रीमंतावर नाही की गरीबावर अन्याय केला नाही. या राज्यातील शेतकऱ्यांने नेमकं केले तरी काय, कोणी तरी आम्हाला सांगा, आमची चुक ती काय, आमच्यावर अन्याय कमी व्हावा म्हणून आम्ही संघर्ष केलाय.

जरांगे पाटील म्हणाले की, मला संपवण्यासाठी अनेक षड्यंत्र रचण्यात आले आहेत. मला पूर्ण घेरलं आहे. मी या गडावरून एकही शब्द खोटं बोलणार नाही. मला होणाऱ्या वेदना माझ्या समाजाला सहन होत नाहीत. समाजाला होणाऱ्या वेदना मलाही सहन होत नाहीत. मला त्रास झाला तर माझा समाज रात्रंदिवस ढसाढसा रडतो. पण माझा नाईलाज आहे. या राज्यातील सर्व बांधवांना सांगतो की तुमच्यामुळं कलंक लागू देऊ नका. पक्ष-पक्ष करू नका. सारखं नेता नेता करू नका. माझ्या समाजाच्या लेकराला कलंक लागू देऊ नका.

जरांगे पाटील म्हणाले की, लढायला शिका. हिंदू धर्माने अन्यायाविरोधात शिकवलं. कायदा आणि संविधानाने अन्यायाविरोधात लढण्याचं शिकवलं आहे. अन्याय होत असेल तर उठाव करायचा हे संविधानाने शिकवलं आहे. आज गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून उठाव चालू आहे. गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्या ही मागणी केली जात आहे. इथे जातीचा संबंध नाही. प्रत्येक जातीने राज्य आणि केंद्राची सुविधा घेतली. आम्ही 14 महिन्यांपासून आरक्षणासाठी झुंजत आहोत. तुमच्यामुळे आरक्षणाला धक्का लागत आहे, असे काहीजण सांगत आहेत.

"कोणावर अन्याय होऊ नये, म्हणून मराठा समाजाने तलवारी हाती घेतल्या आहेत. आमचे रक्त सांडले, आमचे माणसे मारली गेली, पण आम्ही कोणत्याही समाजावर अन्याय होऊ दिला नाही," असे भावनिक वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले. त्यांनी पुढे म्हटले की, "कोणीही आले तरी झुकायचे नाही, परंतु अन्याय होत असेल तर स्वसंरक्षण करणे आवश्यक आहे."

उठाव हा करावाच लागणार आहे. माझ्या समाजाने काहीही केलेले नाही. का आमच्या वाट्याला अन्याय आलाय, असं आम्ही काय पापं केलेय. आमच्या समुदायाला वाट्याला फक्त अन् फक्त अन्याय आलाय.

2:11 PM, 12 Oct

आचारसंहिता लागेपर्यंत वाट पाहा- जरांगे

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आचारसंहिता लागल्यानंतर मी तुम्हाला आपली मुख्य भूमिका सांगणार आहे. आचारसंहिता लागेपर्यंत धीर धरायचा आहे. सरकारला सांगतो की सुट्टी नाही. आचारसंहिता लागल्यानंतर तुम्ही सर्वांनी ऐकायचं. ते काय करतात हे सगळं पाहायचं. त्यांनी सगळं केल्याशिवाय आपण निर्णय घ्यायचा नाही. त्यांनी सगळं केल्यावर आपण निर्णय घ्यायचं. तुमच्या मनात जे आहे, ती ईच्छा पूर्ण करायची जबाबदारी माझी आहे. तुमची शान मी वाढवणारच आहे.
2:02 PM, 12 Oct

मला चारही बाजूने घेरलं- मनोज जरांगे

मला संपवण्यासाठी अनेक षड्यंत्र रचण्यात आले आहेत. मला पूर्ण घेरले आहेत. मी या गडावरून एकही शब्द खोटं बोलणार नाही. मला होणाऱ्या वेदना माझ्या समजाला सहन होत नाहीत. समाजाला होणाऱ्या वेदना मलाही सहन होत नाहीत. मला त्रास झाला तर माझा समाज रात्रंदिवस ढसाढसा रडतो. पण माझा नाईलाज आहे. या राज्यातील सर्व बांधवांना सांगतो की तुमच्यामुळं कलंक लागू देऊ नका. पक्ष-पक्ष करू नका. सारखं नेता नेता करू नका. माझ्या समाजाच्या लेकराला कलंक लागू देऊ नका. समाज सांभाळा. मला चारही बाजूने घेरलं आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
2:00 PM, 12 Oct

उठाव हा केलाच जाणार- आता सुट्टी नाही- जरांगे पाटील

जरांगे पाटील यांनी आपले विचार मांडताना समाजावरील अन्यायाबद्दल संताप व्यक्त केला. "हा समाज जातीवाद करत नाही, आणि कधीच मस्तीत वागत नाही. आम्हाला न्यायाच्या मार्गाने सुखाकडे जायचे आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. "जर पर्याय नसेल, तर आम्हाला उठाव करावाच लागेल," असे ठामपणे त्यांनी सांगितले. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी जरांगे पाटील यांच्या संकल्पाचे समर्थन करत, "जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला विश्वरूप दाखवले आहे," असे म्हटले. विजयादशमीच्या दिवशी त्यांनी समाजाचा निर्धार आणि एकजूट दाखवत यासाठी हा मेळावा बोलावल्याचेही महंतांनी सांगितले.
1:59 PM, 12 Oct

तगडा पोलिस बंदोबस्त

मेळाव्यासाठी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राज्यभरातून आलेल्या हजारो मराठा बांधवांनी नारायणगडावर एकत्र येत आपली एकता दाखवली. हा दसरा मेळावा मराठा समाजाच्या हक्कांच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
1:58 PM, 12 Oct

आता समाजाने सावध व्हा - मनोज जरांगे

आज विजयादशमीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र नारायणगड येथे मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 300 एकरात हा भव्य मेळावा पार पडला. राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या अन्यायाविरोधातील लढ्याचा निर्धार पुन्हा व्यक्त केला. "अन्यायाविरोधात उठाव करावाच लागतो. आमच्या समाजावर केवळ अन्याय येत आला आहे, आणि आता तो सहन करणे शक्य नाही. आम्ही गरिबांवर किंवा श्रीमंतांवर कधीच अन्याय केला नाही, आम्ही सर्वांसाठी झीज केली आहे," असे त्यांनी सांगितले.
1:54 PM, 12 Oct

Manoj Jarange Patil LIve Sabha

जरांगे पाटील म्हणाले की, तुमचे लेकरं अधिकारी बनलेले पाहायचे आहेत. आपले लेकरं प्रशासनात जाऊ द्यायचे नाही, अशी लोकांची इच्छा आहे. मात्र आपले लेकरं प्रशासनात घातल्याशिवाय मागे हटायचं नाही. आपल्याला डावललं जातंय. आपल्यावर अन्याय होतोय- मनोज जरांगे
1:53 PM, 12 Oct

Manoj Jarange Patil Speech Live

जरांगे पाटील म्हणाले की, मला आज समाजबांधवांकडून एक वचन पाहिजे, फक्त हट्ट करून नका. मी तुम्हाला काही सांगितलं तर तुम्हाला ते करावंच लागेल. मी तुमच्या निर्णयाच्या विरोधात जाणार नाही. मी आता त्यांना माझा इंगा दाखवतो. ते नाटकं करत आहेत.
1:46 PM, 12 Oct

तर यावेळी उलथापालथ करावीच लागेल- मनोज जरांगे

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर आपल्याला यावेळी उलथापालथ करावी लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. आपल्या नाकारव टिच्चून कुठला निर्णय होणार असेल आणि या राज्याच्या समाजावर अन्याय होणार असेल गाडावच लागणार. शेवटी आपल्याला आपला समूदाय महत्तवाचा आहे. जनता महत्त्वाची आहे. आपल्यासाठी आपला शेतकरी महत्त्वाचा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+