अखेर बच्चू कडूंच्या उपोषणाला यश; शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, काय ठरलं!
Maharashtra News Bacchu Kadu and devendra Fadnavis : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे, आज त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सहावा दिवस आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली आहे.
अशातच आज शुक्रवारी (दि.13) अमरावतीचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषण स्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली आहे.
त्यांनी बच्चू कडू यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

फडणवीस यांनी काय केली घोषणा?
कर्जमाफीसाठी तातडीने समिती तयार केली जाईल, त्या समितीमध्ये बच्चू कडू यांना घेऊ. त्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ज्या 17 मागण्या बच्चू कडू यांच्या आहेत, त्यासाठी आम्ही बैठक घेऊ, या बैठकीला सर्व विभागाचे मंत्री उपस्थित राहतील, या बैठकीला बच्चू कडू यांची देखील उपस्थिती असेल.
दिव्यांगांचे अनुदान देताना ते बजेटमध्ये आनावं लागतं, त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात ते मांडण्यात येईल. त्यामध्ये किती वाढ करायची, ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व बच्चू कडू ठरवतील.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काय झाली चर्चा!
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती घेऊन तो डेटा जमा केला जाईल व नंतर त्यावर तोडगा काढला जाईल. मात्र त्यानंतर लगेचच बच्चू कडू यांनी तिथे उपस्थित शेतकऱ्यांना विचारलं की हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का? त्यावर सर्वांनी आम्हाला हा निर्णय मान्य नसून, सरसकट कर्जमाफी व्हावी, असं म्हटलं आहे.
बच्चू कडू उपोषणावर ठाम, म्हणाले- आम्हाला मान्य नाही
दरम्यान, कर्जमाफी होईपर्यंत नवीन कर्ज देण्यासाठी मी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये चर्चा करेल व निर्णय घेऊ, असं अश्वासनही यावेळी बावनकुळे यांनी दिलं आहे. मात्र बच्चू कडू हे अजूनही आपल्या उपोषणावर ठाम आहेत, आम्ही यावर समाधानी नाही, आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असं यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications