Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

"भाजपचे लोक विरोधी मतदारांना लाल रंगात.." प्रत्येक मतदारसंघात 10 हजार बोगस मतदार..'या' नेत्याचा आरोप

Jitendra Awhad accuses BJP tampering with voter lists :"भाजपचे कार्यकर्ते विरोधी मतदारांना ओळखण्यासाठी आणि हटविण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करत होते, तर बनावट आधार कार्ड आणि फेरफार केलेल्या डेटाचा वापर करून बनावट मतदार जोडत होते," असा आरोप करत हे सर्व आमच्या तक्रारीत आहे, आम्ही आधीच निवडणूक आयोगाला पूर्वसूचना दिली होी असा स्पष्ट आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी "प्रत्येक मतदारसंघात 10 हजार बोगस मतदार असल्याचा आरोप केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स या सोशल मिडिया अकाऊंटवर एक पोस्ट टाकून भाजपवर मतदार याद्यात अफरातफर केल्याचा आरोप केला आहे. याआधीच राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप केले होते, त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर आरोप केले आहेत.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली, ते यामध्ये म्हणाले की, "महाराष्ट्रात जे विधानसभा निवडणुकीत जे घडले ते केवळ निवडणुकीतील गैरप्रकार नव्हते. ते लोकशाहीवर एक पद्धतशीर, तंत्रज्ञानाने चढविलेला हल्ला होता. 19 ऑक्टोबर 2024 रोजी, मतदान सुरू होण्यापूर्वीच महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला औपचारिकपणे भाजपकडून अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये करत असलेल्या फेरफार बद्दल सतर्क केले होते. ही निवडणूकोत्तर तक्रार नव्हती.ती पूर्वसूचना होती."

'मतदारांना ओळखून हटवण्यासाठी डिजीटल साधनं वापरली'

जितेंद्र आव्हाड म्हणाले, "आमच्या तक्रारीत भाजपचे कार्यकर्ते विरोधी मतदारांना ओळखण्यासाठी आणि हटविण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करत होते, तर बनावट आधार कार्ड आणि फेरफार केलेल्या डेटाचा वापर करून बनावट मतदार कसे जोडत होते याचे तपशीलवार वर्णन केले होते.विरोधी मतदारांना लाल रंगात चिन्हांकित केले गेले होते म्हणजेच हटवण्याचे लक्ष्य होते. भाजप समर्थकांना हिरवे चिन्हांकित केले गेले होते म्हणजेच काढून टाकण्यापासून संरक्षण दिले गेले होते."

'प्रत्येक मतदारसंघात अंदाजे 10 हजार बोगस मतदार'

जितेंद्र आव्हाड म्हणाले, "या याद्या निवडणूक आयोगाच्या मतदार मान्यता प्रणालीवर परिणाम करणाऱ्या खाजगी सर्व्हरवर अपलोड केल्या गेल्या. फसव्या मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यासाठी सायबर कॅफे आणि आधार सेतू केंद्रांना जोडण्यात आले होते. प्रत्येक मतदारसंघात अंदाजे 10 हजार बनावट मतदार होते.17 ऑक्टोबर रोजी, निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने धाराशिवमध्ये एफआयआर दाखल केला, ज्यामध्ये तुळजापूरमध्ये बनावट मतदार नोंदणींचा पूर उघडकीस आला - त्यात सहभागी असलेल्यांची नावे घेतली आणि हे किती खोलवर गेले आहे हे दाखवून दिले."

'आम्ही पुरावे सादर केले'

जितेंद्र आव्हाड म्हणाले, "आम्ही 13 मतदारसंघांमधून ठोस पुरावे सादर केले: शिर्डी, चंद्रपूर, कोथरूड, नागपूर, गोंदियाचा समावेश आहे. आणि तरीही, निवडणूक आयोगाने मौन बाळगले. पण आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही भाजपला आमचे संविधान आणि लोकशाही चिरडून टाकू देणार नाही. आम्ही लढू कारण लोकशाही केवळ निवडणूक रणनीतींबद्दल नाही, ती विश्वासाबद्दल आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत भारतीय संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी असलेल्या संस्थांना मार्गावरून हटवू देणार नाही."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+