विलीनीकरण करायचे असेल तर भाजपला विचारावेच लागेल!; भुजबळांचे राष्ट्रवादीच्या भविष्याबाबत मोठे विधान
Chhagan Bhujbal on NCP BJP Alliance : राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेण्यासाठी जनसागर लोटत असतानाच, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) भवितव्याबाबत आणि दोन राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना अत्यंत परखड आणि महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.

विलीनीकरणाचा निर्णय भाजपशिवाय अशक्य
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना भुजबळ यांनी सत्तेचे समीकरण स्पष्ट केले. ते म्हणाले की, "आम्ही सध्या महायुतीचे घटक आहोत. जर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत काही निर्णय घ्यायचा असेल, तर तो आम्हाला भाजपला विचारल्याशिवाय घेता येणार नाही. कोणाला सोबत घ्यायचे आणि कोणाला नाही, याबाबत भाजपच्या ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करणे अनिवार्य आहे."
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावीच लागेल
भुजबळ यांनी पुढे स्पष्ट केले की, ज्यांच्यासोबत आपण सरकारमध्ये आहोत, त्यांना अंधारात ठेवून कोणताही निर्णय घेता येणार नाही. "आम्ही सत्तेत आहोत, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेतृत्वाचा सल्ला घेणे ही राजकीय शिष्टाचाराची गोष्ट आहे. विलीनीकरणाबाबत माझ्याकडे कोणतीही कल्पना नाही किंवा तशी कोणतीही चर्चा अद्याप झालेली नाही," असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
"ठाकरे बंधूंसारखे पवार एकत्र यावे ही इच्छा, पण..."
राजकारणात अलीकडेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ म्हणाले की, "जसे दोन्ही ठाकरे एकत्र आले, तसे दोन्ही पवार एकत्र यावे ही भावना असू शकते. मात्र, अजितदादांनी असा कोणताही विचार केल्याचे आम्हाला वाटत नाही. दादांनी भाजपसोबत राहूनच काम करण्याचे ठरवले होते. जर सरकारमधून बाहेर पडायचे असेल किंवा एनडीए (NDA) सोडायची असेल तर गोष्टी वेगळ्या असतात, पण दादांच्या मनात तसे काही नव्हते."
अजितदादांनंतर आता नेतृत्व कोणाचे?
अजित पवारांच्या पश्चात पक्षाच्या नेतृत्वाबाबत बोलताना भुजबळ यांनी काही महत्त्वाचे संकेत दिले, भुजबळ यांनी सुचवले की, आगामी काळातील राजकीय निर्णयांबाबत सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली जाईल. "आम्ही उपमुख्यमंत्र्यांची निवड केली आहे, आता त्यांच्या नेतृत्वात चर्चा होतील. राजकारणात काही गोष्टी लगेच घडतात, तर काही गोष्टींना वेळ लागतो," असे म्हणत त्यांनी घाई करण्याची गरज नसल्याचे सांगितले.
-
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम







Click it and Unblock the Notifications