माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडले गेले... वादानंतर भैय्याजी जोशी स्पष्ट बोलले, म्हणाले...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांच्या एका विधानावरुन महाराष्ट्रात चांगलाच गदारोळ झाला. उद्धव ठाकरेंपासून, संजय राऊतांपर्यंत व काँग्रेसच्या काही नेत्यांनीही हे महाराष्ट्र तोडण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरे यांनी तर भैय्याजी जोशी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. त्यानंतर गुरुवारी भैय्याजी जोशी यांनी याबाबत आपली भूमिका मांडली.

विधानाचा गैरसमज केला गेला
आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण देताना भैय्याजी जोशी म्हणाले की, माझ्या विधानाबाबत गैरसमज पसरविण्यात आला. मुंबईची भाषा मराठी नाही यात काही शंका नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. मुंबई महाराष्ट्रात आहे आणि स्वाभाविकच, मुंबईची भाषा मराठी आहे. भारतात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. मुंबईत वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोकही राहतात. त्यामुळे त्यांनीही येथे येऊन मराठी शिकावे, मराठी समजून घ्यावी आणि मराठी वाचावे अशी अपेक्षा स्वाभाविक आहे," असेही ते म्हणाले.
नेमके काय होते प्रकरण?
बुधवारी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान भैयाजी जोशी यांनी एक विधान केले होते. म्हणाले होते की, "प्रत्येकाने मराठी शिकले पाहिजे असे नाही." या विधानानंतर महाराष्ट्रात राजकीय गोंधळ सुरू झाला. अनेकांनी त्यांच्यावर टिका केली.
काय म्हणाले होते फडणवीस?
या विधानाचे प्रकरण महाराष्ट्र विधानसभेत पोहोचले. आरएसएस नेत्याच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, मुंबई आणि संपूर्ण राज्याची भाषा मराठी आहे. मराठी ही राज्याच्या संस्कृती आणि अस्मितेचा एक भाग आहे आणि मराठी शिकणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे." मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर विधानसभेत शिवसेना (यूबीटी) आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार वाद झाला. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की सभागृहाचे कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
उद्धव ठाकरेंचीही टिका
शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर जोरदार टिका केली. भैय्याजी जोशींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या मुद्द्यावर भैय्याजी जोशींवर निशाणा साधला आणि म्हणाले, "आता असे दिसते की मुंबईत फक्त 'केम छो, केम छो' ऐकू येईल.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक











Click it and Unblock the Notifications