"मुली, महिलांवर जे हात टाकतात अशा नराधमांचं ..XXX काढून टाकायला हवं!" - अजित पवारांचा संताप
"आपल्या मुलींवर, महिलांवर जे हात टाकतात अशा काही नराधमांना कायदा दाखवायला हवा.. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर ...तर त्यांचं....काढून टाकायला हवं! परत नाहीच असे कृत्य.. हे केलेच पाहीजे इतके काहीकाही नालायक लोक आहे." अशा भाषेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी बदलापूरसारख्या घटनांवर आपला संताप व्यक्त केला.
महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या प्रसार प्रचार कार्यक्रमात आज ते यवतमाळ इथं बोलत होते.

विरोधक टीका करत होते
अजित पवार म्हणाले, महायुतीचं सरकार शेतकरी कसा समाधानी होईल यावर काम करत आहे. लाडकी बहिण योजना चांगली आहे पण विरोधक टीका करत आहेत. ती योजना बंद करायला कोर्टात गेले आहेत. सुदैवाने कोर्टाने आपल्याबाजूनं मान्यता दिली. महाराष्ट्रातील महिला या योजनेवर खूश आहेत, काहींना या योजनेचा लाभ घेताना अडचणी येत आहेत.
कुणालाही लाभापासून वंचित ठेवणार नाही
अजित पवार म्हणाले, थोडं समजून घ्या, मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो की, कुणालाही लाभापासून वंचित ठेवणार नाही. आम्ही जी नियमावली ठरवली आहे. त्या नियमावलीत तु्म्ही बसला तर तुम्हाला लाभ मिळणार म्हणजे मिळणार. रक्षाबंधन होऊन गेलं आजही माझ्या बहिणी मोठ्या संख्येने राखी बांधतात. आम्ही ओवाळणीच्या निमित्तानं पहिले तीन हजार रुपये सोडलेले आहेत.
वर्षाला ४५ हजार कोटींचा खर्च
अजित पवार म्हणाले, दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत, ही खूप मोठी रक्कम नाही. यातून सर्वच गरजा भागतील असेही नाही पण वर्षाला या योजनेच्या माध्यमातून आम्ही ४५ हजार कोटी रुपये वर्षाला माझ्या गोरगरीब महिलांना मिळणार आहे. हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना ही रक्कम मिळायला हवी. ही योजना चांगली आहे.
सरकार डोळ्यात तेल घालून सुरक्षा करतंय
अजित पवार म्हणाले की, विरोधकांनो जरा बघा महिलांचं लाडकी बहिण योजनेवर काय मत आहे ते सतत काहीतरी टीका टिप्पणी ते करतात, पण माझ्या मायमाऊलींना सांगायचं आहे की, काही विकृत माणसं असतात, काही नराधम असतात तिथं काहीतरी घडलं तर लगेच सांगितलं जातं की, बघा महिलांना आज हे मदत करतात पण सुरक्षिततेचं काय? सुरक्षिततेच्या बाबतीत राज्य सरकार डोळ्यात तेल घालून बघतंय. स्वतः गृहमंत्र्यांनी मोठी पोलिस भरती काढली आहे.
जो चुकीचा त्यांना शासन व्हायलाच हवं
अजित पवार म्हणाले, डोंगरी भाग, विदर्भासह महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी कायदे केले जात आहेत पण काही नराधम काही गोष्टी करतात आणि त्याला या योजनेशी जोडण्याचा विरोधक करतात. माझी विरोधकांना विनंती आहे की, तसे करु नका. जो चुकीचा आहे त्याला शासन व्हायलाच हवं. मग तो कितीही मोठ्या बापाचा असूद्या त्याची आम्ही फिकर करणार नाही. आमचा प्रयत्न आहे की, शक्ती कायदा दिल्लीत राष्ट्रपतींकडे गेला आहे तो लवकर मंजूर करायचा आहे.
-
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा











Click it and Unblock the Notifications