संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावरून परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानला फटकारलं, वाचा सविस्तर
अलिकडे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायाचे स्तोम माजले आहे. याला पाकिस्तानची साथ असल्याचे भारत नेहमी बोलत आला तसे पुरावेही अनेकदा जगाला भारताने दाखवून दिले. भारताने वेळोवेळी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहे पण म्हणतात ना..शेपूट वाकडी ती वाकडी अशीच गत आहे. काल नुकतीच संयुक्त राष्ट्र संघटनेची महासभा पार पडली. या महासभेत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला कडक भाषेत फटकारलं आणि पाकिस्तानच्या आरोपावर जोरदार प्रत्युत्तर दिलं.
पाकिस्तानचे दहशतवाद धोरण यशस्वी होणार नाही
भारतीय परराष्ट्र एस जयशंकर यांनी पाकिस्तानचा जीडीपी केवळ "कट्टरवाद" आणि "दहशतवाद" या निर्यातीच्या संदर्भात मोजला जाऊ शकतो. जयशंकर संयुक्त राष्ट्र महासभेत बोलत होते. पाकिस्तान, गाझा, युक्रेन अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की पाकिस्तानचे सीमापार दहशतवाद धोरण "कधीही यशस्वी होणार नाही" दोषी ठरविण्याची अपेक्षा न करता आणि "कायद्यांचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील".

पाकिस्तानच्या कृत्याचे परिणाम दुसरे भोगताहेत
79 व्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जयशंकर म्हणाले, "दहशतवाद हा जगातील प्रत्येक गोष्टीच्या विरोधात आहे. त्याला त्याचे स्वरूप आणि अभिव्यक्तींमध्ये एक मजबूत विरोधाभास म्हणून ओळखले पाहिजे. "काही देश दहशतवादाच्या परिस्थितीमुळे मागे पडतात तर काही काही देशांनी जाणूनबुजून दहशतवादाला खतपाणी घालतात याचे ज्वलंत उदाहरण पाकिस्तान आहे, जो खतपाणी घालत असुन त्यांना त्यांच्या चुकीच्या कृत्यांचे परिणाम इतरांना भोगावे लागतील, विशेषत: जेव्हा धर्मांधता त्यांच्या लोकांमध्ये रुजवली जाते, तरच कट्टरतावाद आणि दहशतवादी घडू शकतात."
भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यूएनजीएमध्ये पाकिस्तानचे पीएम शाहबाज शफ यांचा मुद्दा उपस्थित केला. आणि कलम 370 साठी दिलेल्या विधानाला उत्तर दिले.
शुक्रवारी आपल्या भाषणात शाहबाज शरीफ यांनी काश्मीरबद्दल सविस्तर माहिती देताना म्हटले होते की, " पॅलेस्टाईनच्या लोकांसारखेच जम्मू-काश्मीरच्या लोकांनीही त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि आत्मनिर्णयाच्या अधिकारासाठी संघर्ष केला आहे." कलम 370 रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाचा संदर्भ देत शरीफ म्हणाले की, चिरस्थायी शांतता निश्चित करण्यासाठी ऑगस्ट 2019 चे 'एकतर्फी आणि चुकीचे उपाय' बदलले पाहिजेत आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा ठराव आणि 'जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार' शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी संवाद सुरू करणे आवश्यक आहे.
जयशंकर यांचं तडाखेबंद उत्तर
जयशंकर या मुद्द्यावर म्हणाले, "मी भारताची भूमिका पूर्णपणे स्पष्ट करतो. पाकिस्तानचे सीमापार दहशतवादाचे धोरण कधीही यशस्वी होणार नाही. आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे. याउलट, कृतींचे परिणाम निश्चितच होतील. आपल्यामध्ये समस्यांचे निवारण करण्याचा मुद्दा फक्त एकच असून तो म्हणजे भारतीय भूभाग आहे. जो पाकिस्तानने कॉर्पोरेट संस्था म्हणून ताब्यात घेतला आहे आणि साहजिकच, पाकिस्तानला अतिरेक्यांची फार पूर्वीपासून आवड आहे.
नाव न घेता चीनवर ओढला आसूड
चीनवर परराष्ट्र मंत्र्यांनी आसूड ओढला. त्यांनी राजकीय कारणांसाठी अडथळा आणू नये त्याच्या कर्जाच्या जाळ्यांवरुन चीनवर टीका केली.












Click it and Unblock the Notifications