'मुस्लिमांनी फेकलेली माती मिसाईल बनते...पाकचे सैन्य अल्लाहचे; असीम मुनीरांची भारताला पुन्हा धमकी!
Pakistan Army Chief Asim Munir : पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर हे पुन्हा एकदा खोटे दावे आणि धार्मिक भावनांच्या आधारावर भारताला धमकी देताना दिसले आहेत.
जॉर्डनचे राजा अब्दुल्लाह दुसरा यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या भोजन समारंभात त्यांनी केवळ पाकिस्तानी सैन्याचे कौतुक केले नाही, तर भारताला इशाराही दिला आहे. 'जर पुन्हा युद्ध झाले तर मुस्लिमांनी फेकलेली माती क्षेपणास्त्रात बदलते,' असे विधान त्यांनी केले.

'माती क्षेपणास्त्र बनते'; धार्मिक रंगासह धमकी
पाकिस्तानी वृत्तपत्र 'डेली जंग' मधील वृत्तानुसार, रविवारी आयोजित केलेल्या भोजन समारंभात असीम मुनीर यांनी आपल्या भाषणात धार्मिक शब्दांचा वापर करत भारताला धमकी दिली. त्यांनी आपल्या सैन्याची प्रशंसा करताना म्हटले की, जर कोणी पुन्हा पाकिस्तानवर युद्ध लादण्याचा प्रयत्न केला, तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल.
मुनीर म्हणाले, पाकिस्तानी सैन्य हे अल्लाहचे सैन्य आहे; आमचे सैनिक अल्लाहच्या नावाने शत्रूशी लढतात. आम्ही अल्लाहच्या आज्ञेनुसार आमची कर्तव्ये पार पाडतो.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जेव्हा एखादा मुस्लिम त्याच्या अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली धूळ क्षेपणास्त्रात बदलते. हे विधान करून त्यांनी भारतीय सैन्याला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आणि पाकिस्तानी सैन्याची क्षमता धार्मिक श्रद्धांशी जोडण्याचा प्रयत्न केला.
मे महिन्यातील संघर्षावर खोटा विजय घोषित
याच भाषणात लष्करप्रमुख मुनीर यांनी मे महिन्यात भारतासोबत झालेल्या कथित चार दिवसांच्या संघर्षाचा उल्लेख केला. त्यांनी पुन्हा एकदा खोटा दावा केला की 7 ते 10 मे दरम्यान झालेल्या संघर्षात पाकिस्तानचा विजय झाला होता.
पाकिस्तानी सैन्याने भारतीय हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले वास्तविक, दोन्ही देशांदरम्यान कोणताही मोठा युद्धसदृश संघर्ष झाला नव्हता, तरीही मुनीर यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी खोटा विजय घोषित केला.
जॉर्डनसोबत संरक्षण संबंध मजबूत करण्याचे आश्वासन
जॉर्डनचे राजा अब्दुल्लाह द्वितीय हे त्यांच्या शिष्टमंडळासह दोन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर होते. या भेटीचा उद्देश दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य वाढवणे हा आहे. या समारंभात लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी जॉर्डनसोबत संरक्षण संबंध मजबूत करण्याची वचनबद्धता व्यक्त केली. त्यांनी पाकिस्तानला लष्करी सहकार्य वाढवण्यासाठी आणि 'शांततापूर्ण प्रदेशाचे परस्पर स्वप्न' एकत्रितपणे साकार करण्यासाठी सर्व पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले.
एकीकडे, पाकिस्तान आंतरराष्ट्रीय भागीदारांसमोर शांततेचे आणि सहकार्याचे स्वप्न साकार करण्याची भाषा करत आहे, तर दुसरीकडे त्याचे लष्करप्रमुख भारताविरुद्ध धार्मिक आणि युद्धात्मक भाषा वापरून खोटे दावे करत आहेत. या विसंगतीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.












Click it and Unblock the Notifications