इराण अणुऊर्जा केंद्रांवरील हल्ल्यानंतर रेडिएशनचं संकट? जाणून घ्या सध्याची वस्तुस्थिती
इस्रायलकडून इराणमधील अणु केंद्रांवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांनंतर आशियासह संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः नतांज (Natanz) येथील संवेदनशील युरेनियम संवर्धन प्रकल्पावर झालेल्या मोठ्या हल्ल्यामुळे न्यूक्लियर रेडिएशनचा धोका निर्माण झाला आहे का? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे.

नतांज प्रकल्पावर थेट हल्ला, पण रेडिएशनचं काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इस्रायलने इराणच्या नतांज अणुऊर्जा प्रकल्पावर लक्ष्यबद्ध हल्ला केला. इथेच इराणने अण्वस्त्र निर्मितीसाठी युरेनियम संवर्धन सुरू केले होते. हल्ल्यामुळे या ठिकाणचा मोठा भाग नष्ट झाल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र, अंतरराष्ट्रीय अणूऊर्जा संस्था (IAEA) यांनी यासंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्यानुसार, सद्यस्थितीत रेडिएशन गळतीचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. संस्थेच्या निरीक्षक पथकाने घटनास्थळाची तपासणी केली असून रेडिएशनचा धोका सध्या तरी निष्क्रिय आहे, असं स्पष्ट केलं आहे.
रेडिएशन म्हणजे नक्की काय आणि ते का घातक ठरतं?
न्यूक्लियर रेडिएशन म्हणजे अणूच्या विघटनामुळे निर्माण होणारी तीव्र किरणे, जी मानवी शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. यामुळे:
त्वचा गंभीर भाजणे
डीएनएवर प्रतिकूल परिणाम
कर्करोगाची शक्यता वाढते
दीर्घकालीन संपर्कामुळे मृत्यूचाही धोका
युरेनियम हे एक अतिजड व विकिरणक्षम धातू असून अण्वस्त्र निर्मितीमध्ये त्याचा वापर होतो. त्याच्या संपर्कात आल्यास शारीरिक नुकसान अपारंपरिक पद्धतीने होते, जे सहज उपचाराने दूर होऊ शकत नाही.
इराणमध्ये किती अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम सुरू?
IAEA च्या अंदाजानुसार, इराणने आतापर्यंत इतकं युरेनियम संवर्धित केलं आहे की त्यातून सुमारे ९ अणुबॉम्ब तयार करता येतील. सध्या इराणमधील ६ ठिकाणी युरेनियम संवर्धनाचे कार्यक्रम सुरू आहेत, त्यापैकी नतांज हा सर्वात मोठा व महत्त्वाचा प्रकल्प होता.
इस्रायलकडे किती अण्वस्त्र आहेत?
इस्रायलने आपल्या अण्वस्त्र क्षमतेबाबत कधीच अधिकृत कबुली दिली नाही. मात्र नागासाकी विद्यापीठाच्या अहवालानुसार, इस्रायलकडे सुमारे ९० अणुबॉम्ब असून ते सात गुप्त शहरांमध्ये सुरक्षित ठेवलेले आहेत. ही माहिती गुप्तचर अहवालांवर आधारित असून इराणनेही याचाच आधार घेत इस्रायलला इशारा दिला होता की, हल्ला झाल्यास त्याच्या अणुउर्जा केंद्रांवर लक्ष्यभेदी हल्ले होतील.
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ची आठवण
या पार्श्वभूमीवर अनेकांना भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ची आठवण झाली आहे. काही काळापूर्वी, पाकिस्तानमधील सरगोधा एअरबेसवर हल्ल्यानंतर किराणा हिल्स परिसरात रेडिएशन गळतीची अफवा पसरली होती. मात्र त्याची कोणतीही अधिकृत पुष्टी झाली नव्हती.
सध्याची स्थिती काय सांगते?
इस्रायल-इराण संघर्षाचं रूपांतर थेट अणुउर्जा केंद्रांवर हल्ल्यांमध्ये झाल्यानं जागतिक पातळीवर चिंता वाढली आहे. तथापि, आत्तापर्यंतच्या अधिकृत अहवालांनुसार, रेडिएशनचा कोणताही तत्काळ धोका नाही. पण पुढील काही दिवस या भागासाठी अत्यंत संवेदनशील असणार आहेत.












Click it and Unblock the Notifications