Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'हा' धातू ठरतोय आधुनिक सोने; सोन्यापेक्षाही जास्त पटीने वाढतेय मागणी? काय आहे कारण? का होतेय चर्चेत?

सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र आता अजून एका धातुची चर्चा सुरु आहे. तो धातू आहे तांबे. तांब्याच्या किमतीत अलिकडे लक्षणीय वाढ झाली आहे. अलिकडेच त्याची किंमत प्रति टन १०,००० डॉलर्सच्या वर पोहोचली होती. याचे कारण म्हणजे प्रत्येक नवीन युगातील तंत्रज्ञानात त्याचा वाढलेला वापर. सध्या तांब्याला सुपर मेटल म्हटले जात आहे. तांबे हे पुढील युगातील सोने आहे, असे मत वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी म्हटले आहे.

copper consumption increased

काय म्हणतात अग्रवाल?

अग्रवाल यांनी X वर एक फोटो शेअर केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, तांबे हे पुढचे सोने आहे. बॅरिक गोल्ड ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सोने उत्पादक कंपनी आहे. आता ही कंपनी फक्त बॅरिक या नावाने ओळखली जाईल. याचे कारण म्हणजे कंपनी तांब्याच्या खाणीवर लक्ष केंद्रित करत आहे. तांबे हा एक नवीन सुपर धातू आहे. प्रत्येक नवीन तंत्रज्ञानात याचा वापर केला जात आहे. ईव्ही असोत, अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा असोत, एआय असोत किंवा संरक्षण उपकरणे असोत, प्रत्येक गोष्टीत तांब्याचा वापर केला जात आहे.

मागणी वाढण्याची कारणे काय?

जगभरात तांब्याच्या खाणी पुन्हा सुरू केल्या जात आहेत. नवीन तांबे वितळवण्याच्या भट्ट्या देखील बांधल्या जात आहेत. हे घडत आहे कारण तांब्याची मागणी खूप वेगाने वाढत आहे. भारतातही क्रिटिकल आणि ट्रान्झिशन मेटल्सच्या क्षेत्रात खूप संधी आहेत . तरुण उद्योजक आणि गुंतवणूकदारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. हे एक मिशन बनवले पाहिजे. येत्या काळात तांब्याच्या किमती आणखी वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे तांब्यामध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

तांब्याची मागणी वाढणार

तांब्याची वाढती मागणी पाहून, अदानी आणि जेएसडब्ल्यू ग्रुपनेही या क्षेत्रात प्रवेश केला आहे. सध्या भारतात फक्त हिंडाल्को इंडस्ट्रीज आणि सरकारी कंपनी हिंदुस्तान कॉपर तांबे उत्पादन करतात. तांबे हे लिथियम आणि कोबाल्टइतकेच महत्त्वाचे आहे. हे रिचार्जेबल बॅटरीमध्ये वापरले जातात. तांब्याचा वापर सेलफोन, एलईडी लाईट्स आणि फ्लॅट-स्क्रीन टीव्हीमध्ये केला जातो. तांब्याचा वापर तारा आणि ट्रान्समिशन लाईन्समध्ये देखील केला जातो. भारत आपल्या बहुतेक तांब्याच्या गरजा आयात करतो. २०१८ मध्ये वेदांताचा स्टरलाईट कॉपर प्लांट बंद झाल्यापासून भारताची तांब्याची आयात वाढली आहे . या कारखान्याने अंदाजे ४,००,००० टन तांबे उत्पादन केले.

भारतातील वापर

भारतात रिफाइंड तांब्याचे उत्पादन दरवर्षी सुमारे ५,५५,००० टन आहे. देशांतर्गत वापर ७,५०,००० टनांपेक्षा जास्त आहे. भारत दरवर्षी सुमारे ५,००,००० टन तांबे आयात करतो. उद्योगाच्या अंदाजानुसार, २०३० पर्यंत भारतातील तांब्याची मागणी दुप्पट होऊ शकते. याचा अंदाज भारतात दरडोई तांब्याचा वापर सुमारे ०.६ किलो आहे, तर जागतिक सरासरी ३.२ किलो आहे यावरून लावता येतो. तांबे उत्पादनात चिली अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर पेरूचा क्रमांक लागतो. चीन आणि काँगो हे देखील तांब्याचे प्रमुख उत्पादक आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+