पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड, देवघरहून दिल्लीला जाण्यास विलंब
Technical failure in Prime Minister Narendra Modi's plane : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. टीव्ही 9 वृत्तवाहिणीने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान हे देवघर विमानतळावर होते. परंतु, त्यांच्या विमानात बिघाड झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे त्यांना दिल्लीला पोहचण्यास विलंब होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात बिघाड झाल्याची पहिलीच घटना आहे. त्यांच्या विमानात नेमकी बिघाड काय झाली, याबाबात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मोदी यांना दिल्लीला जाण्यास विलंब लागणार आहे. मोदी यांना दिल्लीला जायचे होते, परंतु, तत्पूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात प्रचाराच्या दौऱ्यावर होते. हा त्यांचा दौरा गुरूवारीच संपला होता. शिवाजी पार्कवर त्यांची शेवटची सभा पार पडली होती. या सभेनंतर ते दिल्लीत परतले होते.
आज पंतप्रधान मोदी झारखंड दौऱ्यावर होते. या दरम्यान ते एका विशेष विमानाने देवघर आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने जमुईला गेले होते. त्यानंतर परतीच्या प्रवासा दरम्यान पंतप्रधान मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली आहे.
विमानातील या तांत्रिक समस्येनंतर देवघर विमान तळावर विमान उतरवण्यात आले आहे.तसेच या घटनेने नरेंद्र मोदींच्या या पुढील प्रवासासा उशीर होत आहे.
दिल्लीहून विमान पाठवले जात आहे
विमानतळाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हे विशेष विमान भारतीय हवाई दलाचे आहे. वरिष्ठ पायलटने तांत्रिक बिघाडाची माहिती देताच पीएमओने समन्वय साधला आणि हवाई दलाचे विमान दिल्लीहून देवघरला पाठवले.
मोदींची जमुई येथे आदिवासी गौरव दिन कार्यक्रमाला हजेरी
पीएम मोदी आदिवासी गौरव दिन साजरा करण्यासाठी जमुई येथे पोहोचले होते, त्यांनी तेथेही रॅली काढली आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित आदिवासी गौरव दिन सोहळ्यात भाग घेतला. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, आदिवासी समाजानेच राजकुमार रामाला भगवान राम बनवले. आदिवासी समाज हा देशाच्या संस्कृती आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी शेकडो वर्षांचा लढा आहे.
ग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या दशकांमध्ये आदिवासींच्या इतिहासातील अमूल्य योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामागेही स्वार्थाने भरलेले राजकारण होते. देशाच्या स्वातंत्र्याचे श्रेय एकाच पक्षाला द्यायचे, असे राजकारण होते. पण, जर एकाच पक्षाने, एकाच कुटुंबाने स्वातंत्र्य मिळवले असेल, तर मग भगवान बिरसा मुंडा यांचे उलगुलान आंदोलन का करण्यात आले? संथाल क्रांती काय होती? कोळसा क्रांती काय होती, असं त्यांनी सांगितलं.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन










Click it and Unblock the Notifications