जगातील सर्वात उंच चिनाब आर्च ब्रिजचे मोदींच्या हस्ते उद्घाटन; जाणून घ्या- या पुलाचे वैशिष्ट्ये..
PM Narendra Modi / Chenab Rail Bridge : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (6 जून 2025) जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात बांधलेल्या चिनाब पुलाचे उद्घाटन केले. हा पूल चिनाब नदीवर बांधला. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असल्याचा दावा भारत सरकारच्या वतीने करण्यात आला आहे. हा पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
जेव्हा पंतप्रधान मोदींनी चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिजवर तिरंगा फडकावला तेव्हा तो केवळ उद्घाटन समारंभ नव्हता. ते एक शक्तिशाली प्रतीक होते. भारताच्या सार्वभौमत्वाचे, स्वावलंबनाचे आणि धोरणात्मक सामर्थ्याचे हे प्रतिक मानले जात आहे.
उद्घाटन समारंभात पंतप्रधान मोदींनी याला विकास आणि विश्वासाचे प्रतीक म्हटले आणि सांगितले की हा पूल देशाच्या एकता, प्रगती आणि संकल्पाचे प्रतीक आहे. पहलगाम हल्ल्यानंतर मोदींचा पहिलीच जम्मू काश्मीर दौरा होता.

जाणून घ्या मोदींच्या भाषणातील प्रमुख 10 मुद्दे..!
मोदींनी कटरा येथे 42 मिनिटांचे भाषण दिले. त्यात दहशतवाद, पाकिस्तान आणि काश्मीर पर्यटनाचा उल्लेख होता. पंतप्रधान म्हणाले, 'दुर्दैवाने, आपला शेजारी देश मानवता आणि सौहार्दाच्या विरोधात आहे. तो असा देश आहे जो गरिबांच्या उपजीविकेच्याही विरोधात आहे.
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये जे घडले ते याचे एक उदाहरण आहे. पाकिस्तानने मानवता आणि काश्मिरीयतवर हल्ला केला. आम्ही 6 मे च्या मध्यरात्री त्याचा विनाश केला.
चिनाब आर्च ब्रिजचे वैशिष्ट्ये?
रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौडी दरम्यान चिनाब आर्च ब्रिज बांधला गेला आहे. तो २००३ मध्ये मंजूर करण्यात आला. सुरुवातीच्या योजनेनुसार, तो २००९ पर्यंत तयार होणार होता, परंतु तो पूर्ण होण्यास २२ वर्षे लागली.
तो १.२५ किमी पेक्षा जास्त लांब आहे आणि नदीपासून त्याची उंची ३५९ मीटर आहे. तो पॅरिसच्या आयफेल टॉवर (३३० मीटर) पेक्षा २९ मीटर उंच आहे. त्याची किंमत १४८६ कोटी रुपये आहे.
देशातील पहिल्या केबल-स्टेड अंजी पुलाचेही उद्घाटन
पंतप्रधान मोदींनी अंजी खाडवर बांधलेल्या भारतातील पहिल्या केबल-स्टेड रेल्वे पुलाचेही उद्घाटन केले. हा पूल नदीच्या पात्रापासून ३३१ मीटर उंचीवर बांधला आहे. त्याला आधार देण्यासाठी १०८६ फूट उंच टॉवर बांधण्यात आला आहे, जो ७७ मजली इमारतीइतका उंच आहे.
हा पूल रियासी जिल्ह्यातील कटरा ते बनिहालला जोडणाऱ्या अंजी नदीवर बांधला आहे. चिनाब पुलापासून त्याचे अंतर फक्त ७ किमी आहे. या पुलाची लांबी ७२५.५ मीटर आहे. त्यापैकी ४७२.२५ मीटर केबल्सवर आहे.
पंतप्रधान मोदींनी माता वैष्णोदेवींच्या आशीर्वादाचा उल्लेख केला
चिनाब रेल्वे पूल आणि जम्मू-काश्मीरमधील महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "आजचा कार्यक्रम भारताच्या एकतेचा आणि भारताच्या इच्छाशक्तीचा एक मोठा उत्सव आहे.
माता वैष्णोदेवींच्या आशीर्वादाचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले, आज काश्मीर खोरे भारताच्या विशाल रेल्वे नेटवर्कशी जोडले गेले आहे. ते केवळ कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे नाही तर राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक समावेशाचे प्रतीक देखील आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "जम्मू आणि काश्मीर हा भारतमातेचा मुकुट आहे. हा मुकुट सुंदर रत्नांनी जडलेला आहे. ही विविध रत्ने जम्मू आणि काश्मीरची ताकद आहेत. येथील प्राचीन संस्कृती, येथील विधी, येथील आध्यात्मिक चेतना, निसर्गाचे सौंदर्य, येथील औषधी वनस्पतींचे जग, फळे आणि फुलांचा विस्तार, येथील तरुणांचे कौशल्य हे मुकुट रत्नासारखे चमकते.
प्रकल्पादरम्यान येणाऱ्या अडचणींवर पंतप्रधान मोदी म्हणाले
पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण करणे सरकारसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ते म्हणाले, "आमच्या कार्यकाळात या महत्त्वाच्या प्रकल्पाला गती मिळाली आणि आज आपण ते खऱ्या स्वरूपात पाहत आहोत हे आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे.
प्रकल्पादरम्यान आलेल्या अडचणींची आठवण करून देताना ते म्हणाले, "डोंगरांवरून सतत दगड पडणे, प्रतिकूल हवामान आणि कठीण रस्ते असूनही, आमच्या सरकारने कधीही हार मानली नाही. आम्ही आव्हानांना आव्हान देण्याचा मार्ग निवडला आणि जिंकलो."
पंतप्रधान मोदी म्हणाले की, केंद्रात भाजप सरकारची 11 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि ही वर्षे गरीब कल्याण आणि राष्ट्र उभारणीसाठी पूर्णपणे समर्पित आहेत. पंतप्रधान म्हणाले, "विकसित भारताचे स्वप्न जितके मोठे आहे तितकेच ते मजबूत आहे.
आजचा कार्यक्रम भारताच्या एकतेचा आणि त्याच्या अढळ इच्छाशक्तीचा एक मोठा उत्सव आहे." पंतप्रधान म्हणाले, "आज उद्घाटन झालेले आणि पायाभरणी झालेले 46,000 कोटी रुपयांचे प्रकल्प जम्मू आणि काश्मीरच्या विकासाला नवीन चालना दिल्याशिवाय राहणार नाही.












Click it and Unblock the Notifications